धानपीक धोक्यात : कार्यालयास कुलूप ठोकण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशाराअहेरी : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या चिंचगुंडी येथील लघुसिंचन योजना बंद पडली असल्याने या योजनेवर अवलंबून असलेले धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुुळे सदर योजना दुरूस्त करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.चिंचगुंडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी १५ वर्षांपूर्वी उपसा सिंचन योजना बांधण्यात आली. या योजनेमुळे जवळपास ५०० हेक्टर शेती सिंचनाखाली आली व गावातील १०० पेक्षा अधिक शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. वर्षाचे ३०० रूपये पाणी कर भरत होते. सात वर्षांपूर्वी येथील दोनपैकी एका मोटारमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे एकाच मोटारवर काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी दुसऱ्याही मोटारमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे आता ही योजना पूर्णपणे बंद पडली आहे. योजना सुरू न केल्यास ७ सप्टेंबर रोजी सिंचन विभागाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शेतकरी सेवा संघाचे संयोजक रमेश चुक्कावार यांनी दिला आहे. याबाबत शाखा अभियंता के. गोणीबसप्पा यांना विचारणा केली असता, ग्रामस्थांनी पाणी सुरक्षा संस्था स्थापन करून ही योजना राबवावी, गावकरी समोर येत नसल्याने आम्ही ही योजना राबवित आहोत. निधी अभावी दुरूस्ती रखडली आहे. निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)उडवाउडवीची उत्तरेयोजना दुरूस्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्यास सदर योजना विद्युत पुरवठा नसल्याने बंद असल्याचे सांगितल्या जाते व विद्युत विभागाशी संपर्क केल्यास पुरवठा ठिक आहे. लघुसिंचन विभागाने लावलेली डीपी खराब झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे योजना नेमकी कशामुळे बंद आहे, हे कळण्यास मार्ग नाही.
चिंचगुंडीतील लघुसिंचन योजनेत बिघाड
By admin | Updated: September 3, 2016 01:26 IST