शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

तुकूम येथील सिंचन बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:38 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव : परिसरातील १०० एकर शेती धोक्यात; मागील वर्षी स्वत:च केली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे.धानोरा तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मोठा सिंचन प्रकल्प बांधणे अशक्य आहे. या तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. या पिकासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता भासते. या परिसरात लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांवर बंधारे बांधल्यास जवळपासच्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने धानोरा तालुक्यात अनेक बंधारे बांधले. धानोरा तालुकास्थळापासून जवळच असलेल्या तुकूम येथील शेतशिवारातही जिल्हा परिषदेने सन २००८-०९ मध्ये बंधारा बांधला. या बंधाºयावर लाखो रूपये खर्च केले. या बंधाºयाच्या माध्यमातून जवळपास १०० एकर शेतीला सिंचनाची सुविधा उलब्ध झाली होती. मात्र सिंचन विभागाने बंधाºयाची देखभाल व दुरूस्ती केली नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी बंधाºयाच्या बाजूची माती वाहून गेली व बंधारा फुटला. त्यानंतर शेतकºयांनी बंधारा दुरूस्त करून देण्याची अनेकवेळा मागणी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे केली आहे. मात्र बंधारा दुरूस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण सिंचन विभागाने बंधाºयाची दुरूस्ती केली नाही. सिंचन विभाग बंधाºयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात घेऊन शेतकºयांनी मागील वर्षी स्वत:कडचे पैसे गोळा करून जेसीबीच्या सहाय्याने बंधाºयाची दुरूस्ती केली. मात्र पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसात बंधाºयाची बाजूची माती पुन्हा वाहून जाऊन बंधारा फुटला आहे. प्रचंड प्रमाणात भगदाड पडला असल्याने आता शेतकरी सुद्धा हवालदिल झाले आहेत. बंधाºयात पाणी साचून राहत नसल्याने आता या परिसरातील जवळपास ३० शेतकºयांची १०० एकर शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी रोवणीची कामे सुद्धा आता रखडली आहेत.शेतकºयांनी धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना निवेदन दिले. तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत बंधाºयाची पाहणी केली. दुरूस्तीसाठी सिंचन विभागाने पुढाकार घ्यावा, यासाठी पत्र लिहिले.तहसीलदारांना निवेदन देतेवेळी शेतकरी भोजराज रायसिडाम, मंगल सिडाम, चिन्नू कोरेटी, घनश्याम सिडाम, देवाजी तोफा, बाबुराव तोफा, श्यामराव तोफा, रवींद्र मेश्राम, चंदू उसेंडी, सुभाष उसेंडी, रघुनाथ नैताम, आनंदराव आतला, मणिराम हलामी, वातू आतला, सायत्राबाई हलामी यांच्यासह परिसरातील शेतकरी हजर होते. जिल्हा परिषदेने बंधारा दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. बंधाºयाची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर