शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुकूम येथील सिंचन बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:38 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव : परिसरातील १०० एकर शेती धोक्यात; मागील वर्षी स्वत:च केली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे.धानोरा तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मोठा सिंचन प्रकल्प बांधणे अशक्य आहे. या तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. या पिकासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता भासते. या परिसरात लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांवर बंधारे बांधल्यास जवळपासच्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने धानोरा तालुक्यात अनेक बंधारे बांधले. धानोरा तालुकास्थळापासून जवळच असलेल्या तुकूम येथील शेतशिवारातही जिल्हा परिषदेने सन २००८-०९ मध्ये बंधारा बांधला. या बंधाºयावर लाखो रूपये खर्च केले. या बंधाºयाच्या माध्यमातून जवळपास १०० एकर शेतीला सिंचनाची सुविधा उलब्ध झाली होती. मात्र सिंचन विभागाने बंधाºयाची देखभाल व दुरूस्ती केली नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी बंधाºयाच्या बाजूची माती वाहून गेली व बंधारा फुटला. त्यानंतर शेतकºयांनी बंधारा दुरूस्त करून देण्याची अनेकवेळा मागणी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे केली आहे. मात्र बंधारा दुरूस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण सिंचन विभागाने बंधाºयाची दुरूस्ती केली नाही. सिंचन विभाग बंधाºयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात घेऊन शेतकºयांनी मागील वर्षी स्वत:कडचे पैसे गोळा करून जेसीबीच्या सहाय्याने बंधाºयाची दुरूस्ती केली. मात्र पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसात बंधाºयाची बाजूची माती पुन्हा वाहून जाऊन बंधारा फुटला आहे. प्रचंड प्रमाणात भगदाड पडला असल्याने आता शेतकरी सुद्धा हवालदिल झाले आहेत. बंधाºयात पाणी साचून राहत नसल्याने आता या परिसरातील जवळपास ३० शेतकºयांची १०० एकर शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी रोवणीची कामे सुद्धा आता रखडली आहेत.शेतकºयांनी धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना निवेदन दिले. तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत बंधाºयाची पाहणी केली. दुरूस्तीसाठी सिंचन विभागाने पुढाकार घ्यावा, यासाठी पत्र लिहिले.तहसीलदारांना निवेदन देतेवेळी शेतकरी भोजराज रायसिडाम, मंगल सिडाम, चिन्नू कोरेटी, घनश्याम सिडाम, देवाजी तोफा, बाबुराव तोफा, श्यामराव तोफा, रवींद्र मेश्राम, चंदू उसेंडी, सुभाष उसेंडी, रघुनाथ नैताम, आनंदराव आतला, मणिराम हलामी, वातू आतला, सायत्राबाई हलामी यांच्यासह परिसरातील शेतकरी हजर होते. जिल्हा परिषदेने बंधारा दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. बंधाºयाची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर