शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

लोहपोलाद कारखाना एटापल्ली तालुक्यातच उभारा

By admin | Updated: December 9, 2015 02:00 IST

अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही एकही उद्योग स्थापन झाला नाही.

निवेदन : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीची मागणीअहेरी : अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही एकही उद्योग स्थापन झाला नाही. त्यामुळे या भागात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रशासनाने एटापल्लीत लोहपोलाद कारखाना उभारावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले आहे. आजपर्यंत या भागातील खनिज व वन संपत्ती इतरत्र हलविण्यात आली आहे. त्यामुळे येथील तरूणांना रोजगाराअभावी रिकामे बसावे लागते. हा या भागातील बेरोजगार युवकांवरील मोठा अन्याय आहे. या भागातील बांबू व सागवन वनसंपत्ती जिल्हाबाहेर नेल्या जात आहे. त्यामुळे बांबूवर आधारित कागद कारखाना आलापल्ली येथे स्थापन करण्यात यावा, एटापल्ली तालुक्यात लोहपोलाद कारखाना तर देवलमरी येथे सिमेंट उद्योग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांनी स्वीकारले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, प्रेमकुमार झाडे, आत्माराम दुर्गेे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)