शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

लोहपोलाद कारखाना एटापल्ली तालुक्यातच उभारा

By admin | Updated: December 9, 2015 02:00 IST

अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही एकही उद्योग स्थापन झाला नाही.

निवेदन : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीची मागणीअहेरी : अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही एकही उद्योग स्थापन झाला नाही. त्यामुळे या भागात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रशासनाने एटापल्लीत लोहपोलाद कारखाना उभारावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले आहे. आजपर्यंत या भागातील खनिज व वन संपत्ती इतरत्र हलविण्यात आली आहे. त्यामुळे येथील तरूणांना रोजगाराअभावी रिकामे बसावे लागते. हा या भागातील बेरोजगार युवकांवरील मोठा अन्याय आहे. या भागातील बांबू व सागवन वनसंपत्ती जिल्हाबाहेर नेल्या जात आहे. त्यामुळे बांबूवर आधारित कागद कारखाना आलापल्ली येथे स्थापन करण्यात यावा, एटापल्ली तालुक्यात लोहपोलाद कारखाना तर देवलमरी येथे सिमेंट उद्योग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांनी स्वीकारले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, प्रेमकुमार झाडे, आत्माराम दुर्गेे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)