शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धानपीक रोवणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:42 IST

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.

ठळक मुद्देवैरागड परिसरात मजुरांना रोजगार : समाधानकारक पावसाने शेतकरी आनंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपऱ्हे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला तरी मान्सून सक्रीय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ८ जून रोजी झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगरणी व वखरणीची कामे पूर्ण केली. तसेच बाह्य मशागतीचे काम आटोपून आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नसल्याने धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर होते. असे असताना २७ जून रोजी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. समाधानकारक पावसाने शेतकरी सध्यातरी आनंदीत असून खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने भिडले आहे. वैरागड परिसरात शासनाच्या धडक सिंचन व नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच अनेक शेतकºयांनी कृषिपंपाची जोडणी केली. त्यामुळे सिंचनाची सुविधा या भागात झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर वैरागड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानपऱ्हे टाकले. हे पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी रोवणीचे काम हाती घेतले आहे. या कामातून अनेक महिला व पुरूष मजुरांना रोजगार मिळत आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणी साचले आहे. पऱ्हेही रोवणीयोग्य झाल्याने येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा पाऊस बरसल्यास बहुतांश गावातील रोवणीचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस