शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

धानपीक रोवणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:42 IST

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.

ठळक मुद्देवैरागड परिसरात मजुरांना रोजगार : समाधानकारक पावसाने शेतकरी आनंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपऱ्हे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला तरी मान्सून सक्रीय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ८ जून रोजी झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगरणी व वखरणीची कामे पूर्ण केली. तसेच बाह्य मशागतीचे काम आटोपून आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नसल्याने धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर होते. असे असताना २७ जून रोजी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. समाधानकारक पावसाने शेतकरी सध्यातरी आनंदीत असून खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने भिडले आहे. वैरागड परिसरात शासनाच्या धडक सिंचन व नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच अनेक शेतकºयांनी कृषिपंपाची जोडणी केली. त्यामुळे सिंचनाची सुविधा या भागात झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर वैरागड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानपऱ्हे टाकले. हे पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी रोवणीचे काम हाती घेतले आहे. या कामातून अनेक महिला व पुरूष मजुरांना रोजगार मिळत आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणी साचले आहे. पऱ्हेही रोवणीयोग्य झाल्याने येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा पाऊस बरसल्यास बहुतांश गावातील रोवणीचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस