शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

१४९ ग्रा.पं.त इंटरनेट सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:56 IST

प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.

ठळक मुद्देप्रशासनात गतिमानता आणण्याचा प्रयत्न : पहिल्या टप्प्यात २३८ ग्रा.पं.मध्ये काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.केंद्र शासन ग्रामसभांना विशेष महत्त्व देत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती या मध्यस्थी स्वयंसेवी संस्थांना टाळून सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात निधी जमा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या निधीच्या वापराबरोबरच ग्रामपंचायतीच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी ग्रामपंचायत सर्वप्रथम इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडता येणे आवश्यक आहे. गावापर्यंत केबल गेल्यास गावातील इतर संस्था व नागरिकांनाही इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. याच उद्देशाने देशातील प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचे धोरण केंद्र शासनाने अवलवंबिले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५५ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यातील ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हीटी देण्यासाठी आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सद्य:स्थितीत १४९ ग्रामपंचायतीमध्ये केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी इंटरनेटसेवेने जोडल्या गेल्या आहेत. ८९ ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या तालुक्याची निवड केली आहे, या तालुक्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रभाव नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यातील सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. तसेच नक्षलचळवळ सुद्धा कार्यरत आहे. अशा परिस्थितीत केबल टाकण्यात फार मोठ्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांपर्यंत मोबाईल टॉवर पोहोचले नाही. त्यामुळे तेथील नागरिक, युवक इंटरनेट व मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. शासकीय कार्यालयांचे कारभार आॅनलाईन झाले आहेत. मात्र गावात इंटरनेट नसल्याने हे व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती. गावात इंटरनेट सेवा पोहोचल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबरच शिक्षक, तलाठी, आरोग्यसेवकांना इंटरनेटची सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने त्यांचेही काम सोपे होणार आहे.गावातही मिळणार इंटरनेट सेवाओएफसी केबल हे दूरसंचार क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. पारंपरिक ब्रॉडबँडच्या तुलनेत ओएफसी केबलमुळे इंटरनेटची क्षमता २० ते २५ पटीने वाढते. गावापर्यंत पोहोचलेल्या ओएफसी केबलला जोडून गावातील इतर नागरिकांनाही इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेता येणार आहे. दिवसेंदिवस आॅनलाईन व्यवहारांचे महत्त्व वाढत चालले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही इंटरनेट सेवा घेण्यास इच्छुक आहेत. ज्या गावांमध्ये बँक, शाळा, महाविद्यालये आहेत, त्या गावांसाठी इंटरनेटसेवा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालये सुद्धा स्मार्ट होण्यास मदत होईल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतInternetइंटरनेट