शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

१४९ ग्रा.पं.त इंटरनेट सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:56 IST

प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.

ठळक मुद्देप्रशासनात गतिमानता आणण्याचा प्रयत्न : पहिल्या टप्प्यात २३८ ग्रा.पं.मध्ये काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.केंद्र शासन ग्रामसभांना विशेष महत्त्व देत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती या मध्यस्थी स्वयंसेवी संस्थांना टाळून सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात निधी जमा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या निधीच्या वापराबरोबरच ग्रामपंचायतीच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी ग्रामपंचायत सर्वप्रथम इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडता येणे आवश्यक आहे. गावापर्यंत केबल गेल्यास गावातील इतर संस्था व नागरिकांनाही इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. याच उद्देशाने देशातील प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचे धोरण केंद्र शासनाने अवलवंबिले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५५ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यातील ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हीटी देण्यासाठी आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सद्य:स्थितीत १४९ ग्रामपंचायतीमध्ये केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी इंटरनेटसेवेने जोडल्या गेल्या आहेत. ८९ ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या तालुक्याची निवड केली आहे, या तालुक्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रभाव नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यातील सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. तसेच नक्षलचळवळ सुद्धा कार्यरत आहे. अशा परिस्थितीत केबल टाकण्यात फार मोठ्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांपर्यंत मोबाईल टॉवर पोहोचले नाही. त्यामुळे तेथील नागरिक, युवक इंटरनेट व मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. शासकीय कार्यालयांचे कारभार आॅनलाईन झाले आहेत. मात्र गावात इंटरनेट नसल्याने हे व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती. गावात इंटरनेट सेवा पोहोचल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबरच शिक्षक, तलाठी, आरोग्यसेवकांना इंटरनेटची सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने त्यांचेही काम सोपे होणार आहे.गावातही मिळणार इंटरनेट सेवाओएफसी केबल हे दूरसंचार क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. पारंपरिक ब्रॉडबँडच्या तुलनेत ओएफसी केबलमुळे इंटरनेटची क्षमता २० ते २५ पटीने वाढते. गावापर्यंत पोहोचलेल्या ओएफसी केबलला जोडून गावातील इतर नागरिकांनाही इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेता येणार आहे. दिवसेंदिवस आॅनलाईन व्यवहारांचे महत्त्व वाढत चालले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही इंटरनेट सेवा घेण्यास इच्छुक आहेत. ज्या गावांमध्ये बँक, शाळा, महाविद्यालये आहेत, त्या गावांसाठी इंटरनेटसेवा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालये सुद्धा स्मार्ट होण्यास मदत होईल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतInternetइंटरनेट