शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदल्यांनी वाढला शिक्षकांच्या रिक्तपदांचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विविध समस्यांमुळे शिक्षक त्या भागात जाण्यास तयार नसतात. गेले तरी तेथून लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता आंतरजिल्हा बदल्यांमुळे दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुशेष अजून वाढला आहे. विशेष म्हणजे अजून जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्या होणे बाकी आहे. त्या बदल्या झाल्यानंतर शिक्षकांची कमतरता चांगलीच जाणवण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे४९ शिक्षक जिल्ह्याबाहेर गेले : केवळ आठ शिक्षक जिल्ह्यात दाखल

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील जि.प. प्राथमिक शाळांच्या आंतरजिल्हा बदल्या दोन दिवसांपूर्वी केल्या. या आंतरजिल्हा बदल्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यातून ४९ शिक्षक जिल्ह्याबाहेर गेले, तर केवळ ८ शिक्षक बाहेर जिल्ह्यातून येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे.जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विविध समस्यांमुळे शिक्षक त्या भागात जाण्यास तयार नसतात. गेले तरी तेथून लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता आंतरजिल्हा बदल्यांमुळे दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुशेष अजून वाढला आहे. विशेष म्हणजे अजून जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्या होणे बाकी आहे. त्या बदल्या झाल्यानंतर शिक्षकांची कमतरता चांगलीच जाणवण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १ हजार ५५० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. १५ टक्के बदलीच्या मर्यादेनुसार एकूण शिक्षक संख्येपैकी ६०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये ५० टक्के प्रशासकीय व ५० टक्के विनंती अशी विभागणी करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र विनंती बदल्या करण्यास आदेशित केले आहेत. त्यामुळे गडचिरोली जि.प. अंतर्गत जवळपास ३०० शिक्षकांच्या विनंती बदल्या होणार आहेत.शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात सुरूवातीला ३१ जुलैपर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र शिक्षण विभागाकडून प्रक्रिया करण्यास उशीर झाल्याने या बदली प्रक्रियेस १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जि.प.मध्ये होणारी शिक्षकांची गर्दी टाळण्यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्याचे आदेश देऊन केवळ विनंती बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली. पण जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या विनंती बदल्या अद्यापही केल्या नाहीत. त्यामुळे दुर्गम भागात चार वर्षांपासून कार्यरत शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. बदल्यांची प्रक्रिया लवकर पार पाडावी, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांकडून होत आहे.शिक्षकांच्या माहितीची पडताळणी सुरूजि.प.प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी संवर्ग १, संवर्ग २ व महिला प्रतिकूल अशा तीन याद्या बदलीपात्र शिक्षकांच्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या माहितीची पडताळणी सुरू आहे. या विनंती बदली प्रक्रियेसाठी शासनाकडून मुदतवाढ मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक