शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

झुडपांमुळे प्रेतांसाठी जागा अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पावसाळ्यात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देसोयींचा अभाव : आरमोरीच्या स्मशानभूमीतील स्थिती; कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गेल्या अनेक वर्षांपासून गरिबांची प्रेते आपल्या पोटात घेऊन त्यांना चीरविश्रांती देणारी आरमोरीची स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या स्मशानभूमीला दाट झाडाझुडपांचा वेढा असल्याने तिचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. मात्र स्थानिक नगर परिषदेने येथे सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सध्या स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आले. प्रेत पुरण्यासाठीही येथे जागा मिळणे कठिण झाले आहे.आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पावसाळ्यात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या येथे उठबस करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. विशेष म्हणजे, स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. अनेक वर्षांपासून असलेले कचºयाचे ढीग अद्यापही उचलण्यात आले नाही. रस्त्याने वीज खांब गाडले आहेत. परंतु दिव्यांची व्यवस्था नाही. सायंकाळच्या सुमारास अंत्यविधीसाठी जाणाºया नागरिकांना जोखीम पत्करून येथे यावे लागते. बसण्यासाठी येथे शेड व ओटे नाहीत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जागेची सफाईसुद्धा केली जात नाही. उन्हाळ्यात लखलखत्या उन्हाचे चटके तर पावसाळ्यात दुर्गंधी, साप, विंचू आदी विषारी प्राण्यांचा धोका पत्करावा लागतो. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी जाणे म्हणजे, जोखीम पत्करण्यासारखे आहे. मात्र प्रशासन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध न करता दुय्यम दर्जाची कामे करीत आहे. अनेक वर्षांपासून कायम दुर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्त्व कायम राहण्यासाठी येथील झुडपी जंगल तोडावे तसेच कचरा व ढीगाºयांची विल्हेवाट लावावी. तेव्हाच स्मशानभूमीचे रूप पालटणार, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.वैैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरूवात करण्यात येईल.- पवन नारनवरे, नगराध्यक्ष, आरमोरी.स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या, यासाठी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी स्मशानभूमीची दुरवस्था झाली. प्रशासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलन उभारण्यात येईल.- हंसराज बडोले, जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ.

टॅग्स :Socialसामाजिक