शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

झुडपांमुळे प्रेतांसाठी जागा अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पावसाळ्यात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देसोयींचा अभाव : आरमोरीच्या स्मशानभूमीतील स्थिती; कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गेल्या अनेक वर्षांपासून गरिबांची प्रेते आपल्या पोटात घेऊन त्यांना चीरविश्रांती देणारी आरमोरीची स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या स्मशानभूमीला दाट झाडाझुडपांचा वेढा असल्याने तिचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. मात्र स्थानिक नगर परिषदेने येथे सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सध्या स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आले. प्रेत पुरण्यासाठीही येथे जागा मिळणे कठिण झाले आहे.आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पावसाळ्यात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या येथे उठबस करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. विशेष म्हणजे, स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. अनेक वर्षांपासून असलेले कचºयाचे ढीग अद्यापही उचलण्यात आले नाही. रस्त्याने वीज खांब गाडले आहेत. परंतु दिव्यांची व्यवस्था नाही. सायंकाळच्या सुमारास अंत्यविधीसाठी जाणाºया नागरिकांना जोखीम पत्करून येथे यावे लागते. बसण्यासाठी येथे शेड व ओटे नाहीत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जागेची सफाईसुद्धा केली जात नाही. उन्हाळ्यात लखलखत्या उन्हाचे चटके तर पावसाळ्यात दुर्गंधी, साप, विंचू आदी विषारी प्राण्यांचा धोका पत्करावा लागतो. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी जाणे म्हणजे, जोखीम पत्करण्यासारखे आहे. मात्र प्रशासन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध न करता दुय्यम दर्जाची कामे करीत आहे. अनेक वर्षांपासून कायम दुर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्त्व कायम राहण्यासाठी येथील झुडपी जंगल तोडावे तसेच कचरा व ढीगाºयांची विल्हेवाट लावावी. तेव्हाच स्मशानभूमीचे रूप पालटणार, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.वैैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरूवात करण्यात येईल.- पवन नारनवरे, नगराध्यक्ष, आरमोरी.स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या, यासाठी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी स्मशानभूमीची दुरवस्था झाली. प्रशासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलन उभारण्यात येईल.- हंसराज बडोले, जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ.

टॅग्स :Socialसामाजिक