शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दारूमुक्त निवडणुकीसाठी २० गावांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST

कुरखेडा : मुक्तिपथतर्फे ''''दारूमुक्त निवडणूक'''' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता व कुरखेडाचे तहसीलदार ...

कुरखेडा : मुक्तिपथतर्फे ''''दारूमुक्त निवडणूक'''' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता व कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी यांची नुकतीच बैठक पार पडली. तालुकाभरात ''''दारूमुक्त ग्रामपंचायत निवडणुक'''' होणे आवश्यक असून, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तालुक्यातील २० गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे.

मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचे वाटप होऊ शकते. दारू वाटणे किंवा पाजणे हा निवडणुकीच्या नियंत्रणाचा भंग होईल. हा गुन्हा आहे. त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांतीपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी डॉ. गुप्ता यांनी तहसीलदारांशी चर्चा करून ''''दारूमुक्त निवडणुक'''' अभियानाची माहिती दिली.

ग्रामपंचायत निवडणूक ही पूर्णतः दारूमुक्त व्हावी, यासाठी गावागावांत ठराव घेऊन मागणी केली जात आहे. आतापर्यंत कुरखेडातील एकूण २० गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून गावागावांत ''''दारूमुक्त निवडणूक'''' संदर्भात जनजागृती केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा दारूचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांकडून ''''मी दारूचे वाटप करणार नाही'''' अशा आशयाचे संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत. स्थानिक प्रशासन व मुक्तिपथ संयुक्तरीत्या दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे, आदी महत्त्वपूर्ण बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.