शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली.

ठळक मुद्देजिल्हाभरातील शेतकरी चिंतेत : अनेक शेतकऱ्यांकडून दोन ते तीनदा पिकावर कीटनाशकाची फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी दोन ते तिनदा कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. रोग १०० टक्के आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली. सुरूवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे धानपिकाची पेरणी लांबली. दरम्यान शेतकऱ्यांनी धडपड करून कसेबसे धानाचे पºहे टाकले. त्यानंतर संततधार पावसाची सुरूवात झाली. धानपिकाची रोवणी आटोपली. मात्र पोळा व गणेश उत्सवानंतरही पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अशा या दमट वातावरणामुळे व अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय खोडकिडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाचे वेळेत व्यवस्थापन करून धानपिकावरील रोग नष्ट करण्याचा सल्ला आत्मा कार्यालय व कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकºयांना दिला आहे. दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रोगग्रस्त पिकाची पाहणी करीत आहेत.पाहणीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक पाऊस, प्रखर सूर्यप्रकाशाचा अभाव, दमट वातावरण, अशा अपोषक वातावरणामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी तज्ज्ञांसह शेतकºयांकडून सांगितले जात आहे. रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकरी पारंपरिक उपाययोजना करीत नाही. कारण कृषी विभागाच्या कर्मचाºयांकडून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकºयांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत नाही. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात धानपिकावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी नैसर्गिक उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे. निंबोळीअर्काचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडे शेतकºयांना केले जात असले तरी निंबोळीअर्क कसा बनवायाचा, त्याची मात्रा किती वापरायची, त्याची फवारणी कशी करायची आदीसह विविध बाबींसंदर्भात शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र असे मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी जिल्हा, तालुका व मोठ्या गावाच्या कृषी केंद्रात जाऊन रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करीत आहेत. कीटकनाशकाची फवारणी धानपिकावर सुरू असून या कामास वेग आला आहे. धानपीक रोगातून वाचविण्याची धडपड सुरू आहे.रात्रीच्या सुमारास पाने कुरतडून खाण्याचे प्रमाण अधिककृषी विभागाच कृषी सहायक, कृषी सेवक व इतर कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन धानपिकाची पाहणी करीत आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार बºयाच भागातील धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. लष्करी अळीचे पतंग कामगंध सापड्यात एक ते तीन दिवस तसेच प्रत्यक्ष शेतात प्रतीचौरस मीटरला एक याप्रमाणे आढळून आले आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हे पतंग कमीअधीक प्रमाणात दिसून येत आहेत. ही परिस्थिती धोकादायक आहे. मादी पतंग २०० ते ३०० अंडी रानटी गवतावर अथवा धानावर घालून ते करड्या धाग्याने झाकते. अंडी सात दिवसांपर्यंत उबवून नंतर ती अळी २० ते २५ दिवस रात्रीच्या सुमारास पाने जास्त कुरतडून खातात.

 

टॅग्स :agricultureशेती