शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली.

ठळक मुद्देजिल्हाभरातील शेतकरी चिंतेत : अनेक शेतकऱ्यांकडून दोन ते तीनदा पिकावर कीटनाशकाची फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी दोन ते तिनदा कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. रोग १०० टक्के आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली. सुरूवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे धानपिकाची पेरणी लांबली. दरम्यान शेतकऱ्यांनी धडपड करून कसेबसे धानाचे पºहे टाकले. त्यानंतर संततधार पावसाची सुरूवात झाली. धानपिकाची रोवणी आटोपली. मात्र पोळा व गणेश उत्सवानंतरही पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अशा या दमट वातावरणामुळे व अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय खोडकिडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाचे वेळेत व्यवस्थापन करून धानपिकावरील रोग नष्ट करण्याचा सल्ला आत्मा कार्यालय व कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकºयांना दिला आहे. दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रोगग्रस्त पिकाची पाहणी करीत आहेत.पाहणीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक पाऊस, प्रखर सूर्यप्रकाशाचा अभाव, दमट वातावरण, अशा अपोषक वातावरणामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी तज्ज्ञांसह शेतकºयांकडून सांगितले जात आहे. रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकरी पारंपरिक उपाययोजना करीत नाही. कारण कृषी विभागाच्या कर्मचाºयांकडून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकºयांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत नाही. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात धानपिकावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी नैसर्गिक उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे. निंबोळीअर्काचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडे शेतकºयांना केले जात असले तरी निंबोळीअर्क कसा बनवायाचा, त्याची मात्रा किती वापरायची, त्याची फवारणी कशी करायची आदीसह विविध बाबींसंदर्भात शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र असे मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी जिल्हा, तालुका व मोठ्या गावाच्या कृषी केंद्रात जाऊन रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करीत आहेत. कीटकनाशकाची फवारणी धानपिकावर सुरू असून या कामास वेग आला आहे. धानपीक रोगातून वाचविण्याची धडपड सुरू आहे.रात्रीच्या सुमारास पाने कुरतडून खाण्याचे प्रमाण अधिककृषी विभागाच कृषी सहायक, कृषी सेवक व इतर कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन धानपिकाची पाहणी करीत आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार बºयाच भागातील धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. लष्करी अळीचे पतंग कामगंध सापड्यात एक ते तीन दिवस तसेच प्रत्यक्ष शेतात प्रतीचौरस मीटरला एक याप्रमाणे आढळून आले आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हे पतंग कमीअधीक प्रमाणात दिसून येत आहेत. ही परिस्थिती धोकादायक आहे. मादी पतंग २०० ते ३०० अंडी रानटी गवतावर अथवा धानावर घालून ते करड्या धाग्याने झाकते. अंडी सात दिवसांपर्यंत उबवून नंतर ती अळी २० ते २५ दिवस रात्रीच्या सुमारास पाने जास्त कुरतडून खातात.

 

टॅग्स :agricultureशेती