लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव/चोप : देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी तालुका व जिल्ह्याच्या बऱ्याच भागात रबी हंगामात अनेक शेतकऱ्यांची धानपिकाची लागवड केली आहे. मात्र रोवणी झालेल्या धानावर वातावरणाचा परिणाम होऊन कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.खरीप हंगामातील धानपीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा रबी हंगामात पैशाची जुळवाजुळव करून उन्हाळी धानपिकासाठी पेरणी केली. उन्हाळी धानाच्या रोवणीचे काम आटोेपले असून धान हिरवेगार दिसून येत आहे. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरेगाव चोप परिसरात कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. २० ते २५ दिवस रोवणी झालेल्या धानपिकावर दोनवेळा फवारणी करूनही कडाकरपा रोग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून रबी हंगामात धानपिकाची शेती केली. मात्र आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.कृषी विभागाचे दुर्लक्षशेतकऱ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी गावपातळीवर कृषीसेवक नेमण्यात आले आहे. सध्या रबी हंगामातील धानपिकावर कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असूनही कृषीसेवक शेतीची पाहणी करून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. बरेच शेतकरी कृषी केंद्र मालकांच्या सल्ल्यानुसार धानपिकावर फवारणी करीत आहेत.
धानपिकावर कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST
खरीप हंगामातील धानपीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा रबी हंगामात पैशाची जुळवाजुळव करून उन्हाळी धानपिकासाठी पेरणी केली.
धानपिकावर कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव
ठळक मुद्देशेतकरी हतबल : रबी हंगामातील धानपीक संकटात; खरीपात अवकाळीने दिला दगा