शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 01:44 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल या कालावधीत केंद्र सरकारच्या पंचायत राज...

सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविणार : प्रशासन लागले कामालाआरमोरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल या कालावधीत केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीने ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान जिल्ह्यातील सर्वच ४५६ ग्राम पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीब लोकांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहे. या अभियानांतर्गत सर्व ग्राम पंचायतींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. समरसता व सद्भावनेची शपथ घेणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची लोकांना माहिती देणे. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाबाबत संवाद घडवून आणण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच ग्रामसभांना संबोधन करणार आहेत. त्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसभा, विशेष बैठका आयोजित करून पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणीद्वारे ऐकण्याची सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात येणार असून या समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. (वार्ताहर)असे होतील कार्यक्रम‘ग्राम उदय से भारत उदय’ या अभियानांतर्गत १७ ते २० एप्रिल या कालावधीत प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये किसान सभा आयोजित करून कृषीविषयक योजनांची देणे तसेच कृषीविषयक सुधारणांबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. १९ एप्रिलला आदिवासी महिला संरपंचांचा राष्ट्रीय स्तरावर मेळावा होणार आहे. २१ ते २४ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय पंचायत राजदिन साजरा करण्याच्या दृष्टीने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ७३ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज संस्थेत घडून आलेले बदल स्थानिक आर्थिक विकासाकरिता ग्राम पंचायत स्तरावर विकास आराखडा तयार करणे, ग्रा. पं. ला मिळणाऱ्या निधीचा विनियोग मूलभूत सुविधांवर करणे आदींवर चर्चा होणार आहे.