शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 01:44 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल या कालावधीत केंद्र सरकारच्या पंचायत राज...

सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविणार : प्रशासन लागले कामालाआरमोरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल या कालावधीत केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीने ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान जिल्ह्यातील सर्वच ४५६ ग्राम पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीब लोकांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहे. या अभियानांतर्गत सर्व ग्राम पंचायतींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. समरसता व सद्भावनेची शपथ घेणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची लोकांना माहिती देणे. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाबाबत संवाद घडवून आणण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच ग्रामसभांना संबोधन करणार आहेत. त्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसभा, विशेष बैठका आयोजित करून पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणीद्वारे ऐकण्याची सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात येणार असून या समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. (वार्ताहर)असे होतील कार्यक्रम‘ग्राम उदय से भारत उदय’ या अभियानांतर्गत १७ ते २० एप्रिल या कालावधीत प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये किसान सभा आयोजित करून कृषीविषयक योजनांची देणे तसेच कृषीविषयक सुधारणांबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. १९ एप्रिलला आदिवासी महिला संरपंचांचा राष्ट्रीय स्तरावर मेळावा होणार आहे. २१ ते २४ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय पंचायत राजदिन साजरा करण्याच्या दृष्टीने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ७३ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज संस्थेत घडून आलेले बदल स्थानिक आर्थिक विकासाकरिता ग्राम पंचायत स्तरावर विकास आराखडा तयार करणे, ग्रा. पं. ला मिळणाऱ्या निधीचा विनियोग मूलभूत सुविधांवर करणे आदींवर चर्चा होणार आहे.