शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्याला गोरजाईचा डोह म्हणून ओळखल्या जाते.

ठळक मुद्देटंचाईची समस्या कायम : गोरजाई डोहावर प्रस्तावित योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून एक दिवसाआड नळाला पाणी येत आहे. मे-जून महिन्यात अर्ध्या गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. दरवर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी गोरजाई डोहावर प्रस्तावित करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात आहे.वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्याला गोरजाईचा डोह म्हणून ओळखल्या जाते. गावातील वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन गोरजाई डोहावर जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कुरखेडा यांच्याकडून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करून मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम कोणत्या एजन्सीमार्फत करायचे हे ठरले नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम पुढे सरकू शकले नाही.एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून अर्ध्याअधिक गावाला नळाचे पाणी मिळत नाही. ज्या कुटुंबांच्या घरी नळाला पाणी येत आहे अशा ठिकाणी लगतच्या घरातील महिलांची पिण्याचे पाणी नेण्यासाठी गर्दी होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.३५ वर्षापूर्वीची पाणी योजना अपुरी३५ वर्षांपूर्वी वैरागड येथे वैलोचना नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारण्यात आली. ३५ वर्षांनंतर वैरागडची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे ही पाणी योजना अपुरी पडत आहे. वाढीव वस्तीमध्ये नळ पाणीपुरवठ्याचा अभाव आहे.सदर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. सदर योजनेचे आर्थिक बजेट मोठे असल्याने मंत्रालयात याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे.- गौरी सोमनानी, सरपंच, ग्रा.पं.वैरागड