शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्याला गोरजाईचा डोह म्हणून ओळखल्या जाते.

ठळक मुद्देटंचाईची समस्या कायम : गोरजाई डोहावर प्रस्तावित योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून एक दिवसाआड नळाला पाणी येत आहे. मे-जून महिन्यात अर्ध्या गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. दरवर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी गोरजाई डोहावर प्रस्तावित करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात आहे.वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्याला गोरजाईचा डोह म्हणून ओळखल्या जाते. गावातील वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन गोरजाई डोहावर जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कुरखेडा यांच्याकडून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करून मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम कोणत्या एजन्सीमार्फत करायचे हे ठरले नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम पुढे सरकू शकले नाही.एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून अर्ध्याअधिक गावाला नळाचे पाणी मिळत नाही. ज्या कुटुंबांच्या घरी नळाला पाणी येत आहे अशा ठिकाणी लगतच्या घरातील महिलांची पिण्याचे पाणी नेण्यासाठी गर्दी होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.३५ वर्षापूर्वीची पाणी योजना अपुरी३५ वर्षांपूर्वी वैरागड येथे वैलोचना नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारण्यात आली. ३५ वर्षांनंतर वैरागडची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे ही पाणी योजना अपुरी पडत आहे. वाढीव वस्तीमध्ये नळ पाणीपुरवठ्याचा अभाव आहे.सदर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. सदर योजनेचे आर्थिक बजेट मोठे असल्याने मंत्रालयात याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे.- गौरी सोमनानी, सरपंच, ग्रा.पं.वैरागड