शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे वाढले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:21 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांमध्ये उत्साह : निकालाच्या अंदाजाची नव्याने केली जातेय उजळणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्यात सरळ लढत झाल्याने दोघांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये वाढली आहे. दुसरीकडे या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन काहीसे वाढले आहे. रिंगणातील इतर तीन उमेदवार आपल्याला किती मतांचा कौल मिळेल या विचाराने टेन्शनमध्ये आले आहेत.जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गेल्या ११ एप्रिल रोजी मतदान झाले होते. नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे नक्षल दहशत असूनही मतदानाची टक्केवारी विदर्भात सर्वाधिक म्हणजे ७१.९८ वर गेली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षाही यावेळी मतदान जास्त झाल्यामुळे मतदारांच्या मनात नेमके काय याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मतदानात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन दिवसात तीन भूसुरूंग स्फोट घडविण्यासोबतच पोलिसांवर फायरिंगही झाली. परंतू तरीही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात वाढलेली ही मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता वाढली आहे.या निवडणुकीत भाजप-सेना युतीचे अशोक नेते, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. मात्र खरी लढत नेते आणि उसेंडी या दोनच उमेदवारांमध्ये झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपलाच उमेदवार जिंकणार असा विश्वास त्यांच्यात दिसत आहे.विजयोत्सव साजरा करण्याची तयारीमतदानानंतर निकालासाठी तब्बल सव्वा महिना वाटप पहावी लागली. आता एकदाचा कधी विजयोत्सव साजरा करतो, या आशेने दोन्ही प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. कमी फरकाने का होईना, आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. विजयाचा जल्लोष करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. परंतू त्यांचा हिरमोड तर होणार नाही ना, याची चिंताही उमेदवारांना व प्रमुख कार्यकर्त्यांना लागली आहे.मतमोजणीसाठी प्रशासन सज्जमतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मतमोजणीचे ठिकाण असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. जवळपास ७०० वर कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत. मतमोजणीच्या २५ फेºया आणि पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास संध्याकाळ होणार आहे. मात्र प्रत्येक फेरीतील मतांच्या आघाडीवरून कोण बाजी मारणार याचा अंदाज आधीच येऊ शकेल.