शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

बियाणे बदलाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:59 IST

दरवर्षी बियाणांचे नवीन वाण बाजारात उपलब्ध होतात. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादनात भर पडेल, असे आश्वासन बियाणे निर्मिती कंपन्यांकडून केली जात असल्याने बियाणे बदलविण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देउत्पादनात होते वाढ : गरजेनुसार उपलब्ध करून द्यावे लागतात बियाणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी बियाणांचे नवीन वाण बाजारात उपलब्ध होतात. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादनात भर पडेल, असे आश्वासन बियाणे निर्मिती कंपन्यांकडून केली जात असल्याने बियाणे बदलविण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबिन, तूर, कापूस, मका, उडीद, तीळ आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यातील धानपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याचबरोबर धानाचे दरवर्षी नवीन वाण बाजारात येते. या नवीन वाणाची उत्पादन क्षमता अधिक आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता जास्त असून उत्पादनाचा दर्जा चांगला असल्याने संबंधित धानाला चांगला भाव मिळते, अशी जाहिरात कंपन्यांच्या वतीने केली जाते. यातील काही वाण निश्चितच चांगले राहतात. उत्पादनात वाढ होईल, या अपेक्षेने शेतकरी नवीन वाण खरेदी करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बियाणे कंपन्यांची चांदी होते. हीच बाब कापूस पिकासाठी लागू होते. दरवर्षी अनेक कापूस कंपन्या बियाणे विक्रीसाठी पुढे येतात व जाहिरात करतात.उडीद, तीळ या पिकांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात संशोधन असल्याने बाजारात या पिकांचे नवीन वाण सहजासहजी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडे असलेले जुने बियाणेच वापरतात.कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार २०१७ मधील खरीप हंगामात २५ टक्के बियाणे नवीन खरेदी केले. ७४ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबिनचे बियाणे बदलविले. ७.५२ टक्के तुरीचे बियाणे बदलले. कापूस १०० टक्के, मक्का १.७१ टक्के बियाणे बदलविले आहेत. २०१८ मध्ये हे प्रमाण वाढून ३३.३७ टक्के धान, ८० टक्के सोयाबिन, ३० टक्के तूर, १०० टक्के कापूस पिकाचे बियाणे बदलविले जाणार आहेत.बियाणे बदलविण्याचे प्रमाण वाढल्यानंतर तेवढे बियाणे बाजारात उपलब्ध करून द्यावी लागतात. अन्यथा बियाणांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांना अधिकची किंमत मोजावी लागते. त्यामुळे दरवर्षी कृषी विभाग किती बियाणे बदलविले जातील, याचा अंदाज घेत राहते.बियाणे कंपन्या चांगल्या दर्जाचे बियाणे सीलबंद करून बाजारात उपलब्ध करतात. त्यामुळे शेतकऱ्याला वर्षभर बियाणे ठेवावे लागत नाही. त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे बियाणे राहत असल्याने त्यांची उगवण क्षमता अधिक राहते. त्यामुळे उत्पादन वाढत असल्याने शेतकरी दोन पैसे अधिक गेले तरी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यास पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.कृषी विभागाकडून बियाण्यांवर प्रक्रियेचे प्रशिक्षणकंपन्यांचे बियाणे बाजारात उपलब्ध असले तरी या बियाणांची किंमत अधिक राहत असल्याने सर्वसाधरण शेतकºयाला हे बियाणे परवडत नाही. त्याचबरोबर मोठा शेतकरी असला तरी सर्वच नवीन बियाणे खरेदी करणे त्याला सुद्धाही शक्य होत नाही. मागील काही वर्षांपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना बियाणांवर कशी प्रक्रिया करावी, जेणे करून बियाणांची उगवण क्षमता वाढण्यास मदत होईल, याबाबतचे प्रशिक्षण गावपातळीवर जाऊन केले जात आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार बियाणे तयार केल्याने उगवण क्षमता वाढल्याचा अनुभव शेतकºयांना येत असल्याने काही शेतकरी स्वत:च घरच्या बियाणांवर प्रक्रिया करून त्यांची पेरणी करीत आहेत. विशेष करून धानपिकाबाबत या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यास फार मोठी मदत होत आहे. बियाणे निर्मितीच्या प्रशिक्षणांमध्ये कृषी विभागाने वाढ केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :Farmerशेतकरी