शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर्समुळे आजारांत वाढ

By admin | Updated: June 23, 2014 00:05 IST

मागील आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहेत. मात्र टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार

विलास चिलबुले - आरमोरीमागील आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहेत. मात्र टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. परंतु शहरातील बहुतांश टॉवर बेकायदेशिर रित्या उभे आहेत. नियमाला बगल देऊन काही टॉवर शाळा, कॉन्व्हेंटच्या आवारात असल्याने परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना कर्करोग, स्मृतिभंश यासह डोकेदुखी, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, रोग प्रतिबंधक शक्ती कमी होणे आदी आजार जडत आहेत.टॉवर जेवढे जास्त तेवढा नेटवर्क चांगला असे समीकरण बनले असल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल कंपन्या मोक्याच्या जागा शोधून टॉवर उभारत आहेत. शहरातील बरेचसे टॉवर भर वस्तीत उभारले आहेत. आरमोरी शहरात जवळपास सात ते आठ टॉवर असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणामही पडत आहे. ग्राहकांची संख्या वाढल्याने ग्राहकांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. याबरोबरच टॉवरची संख्याही वाढली आहे. खुल्या जागेत तसेच इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी मालकांना दरमहा दहा ते पंधरा हजार रूपयापर्यंत भाडे मिळत असते. या रकमेसाठी कोणत्याही स्वरूपाच्या दुष्परिणामाची पर्वा न करता टॉवरसाठी अनुमती दिली जाते. रहिवासी, शाळा, कॉन्व्हेंटच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. टॉवरमधून निघणाऱ्या रेडीओ लहरीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने लागू केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. टॉवरमुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अतिदाबाच्या लहरीपणामुळे कमी वजनाच्या पक्ष्यांच्या शरिरातील तापमानात वाढ होत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे चिमणी, कावळ्याचे अस्तित्व शहरातून नष्ट होत आहे. २०० फुट उंचीच्या टॉवरमधून निर्माण होणाऱ्या रेडिओ लहरी जमीन समांतर जातात. टॉवरमधील विद्युत चुंबकीय लहरींचा मानवी शरीरावर परिणाम होऊन कर्करोग यासह गर्भवती महिलांवरही दुष्परिणाम होत आहेत.