शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मासे व भाजीपाला उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:21 IST

राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले.

ठळक मुद्देशाश्वत शेती : आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांमुळे २१५४ एकर शेतीला सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले. शिवाय मत्स्यपालन व भाजीपाला लागवडीतही भरघोस वाढ झाली.शेततळ्यांमुळे खरीप व रबी हंगामातील पिकाला सिंचनाची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर आरमोरी तालुक्यातील शंकरनगर, देविपूर, वडधा या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शेततळ्यात मत्स्यबीज टाकून मत्स्यपालनसुद्धा करून आर्थिकदृष्ट्या नफ्याची शेती केली आहे. शेततळ्यासाठी १२ आर क्षेत्र लागत असून शेततळ्याच्या पाळीवरील ६ आर जागेत तुरीचे पीक घेतले जात आहे. त्यामुळे शेततळ्यात अत्यल्प क्षेत्र कामी लागत आहे.शेततळ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडते. तसेच आवश्यकतेनुसार पिकाला पाणीसुद्धा देता येते. त्यामुळे शेततळे विविध पिकांसाठी वरदान ठरत आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणीसुद्धा शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मत्स्यपालनासह भाजीपाला लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. तालुक्यातील १०३ गावांमध्ये शेततळ्यांचे काम झाले आहे.अपुºया व अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक अंतिम टप्प्यात पावसाअभावी नष्ट होते. अथवा अत्यल्प उत्पादन मिळते. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता शेतकºयांनी शासकीय योजनांच्या लाभातून सिंचन सुविधा निर्माण करावी.- एस. पी. ढोणे, तालुका कृषी अधिकारी., आरमोरी

टॅग्स :Waterपाणी