शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अपूर्ण बांधकाम;अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

वैरागड मार्गावरील एका वळणावर मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होता. याबाबत दोन महिन्यांपूर्वी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वळण मार्गावर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रस्ता भरण्याच्या कामात दिरंगाई झाली. रस्त्याचे रूंदीकरण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने उशिर केला.

ठळक मुद्देकाम पूर्ण करण्याची मागणी : जोगीसाखरा-वैरागड मार्गावरील वळण

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : जोगीसाखरा-वैरागड मार्गावरील एका वळणावर पुरामुळे खड्डा पडून दुरवस्था झाली. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वळण रस्त्यावर संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. परंतु हे काम अर्धवट ठेवल्याने आता येथे अपघाताचा धोका बळावला आहे. अपूर्ण असलेले बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.वैरागड मार्गावरील एका वळणावर मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होता. याबाबत दोन महिन्यांपूर्वी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वळण मार्गावर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रस्ता भरण्याच्या कामात दिरंगाई झाली. रस्त्याचे रूंदीकरण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने उशिर केला. संरक्षक भिंत व वाहून गेलेल्या ठिकाणी मुरमाऐवजी वैरागड-देलनवाडी मार्गावरील काढून फेकलेले डांबराचे पापुद्रे आणून खड्डा बुजविण्याचे काम सुरू केले. परंतु नागरिकांनी विरोध केल्याने खड्डे बुजविण्याचे काम बंद पाडले. तेव्हापासून आता पंधरा दिवसांचा कालावधी उलटला. मात्र येथे नव्याने मुरूम टाकण्यात आले नाही. वळण मार्ग असल्याने अवजड वाहने खड्ड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण मार्गावरील खड्डे बुजवून अपूर्ण बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रूंदीकरणाची गरजजोगीसाखरा-वैरागड मार्गावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. येथून दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहने ये-जा करीत असतात. देसाईगंज येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर नागरिक करतात. हा मार्ग जंगलातून गेला आहे. शिवाय अरूंद आहे व रस्त्याच्या कडा पूर्णत: खचलेल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्षच होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग