शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा

By admin | Updated: November 23, 2015 01:22 IST

महाराष्ट्र राज्याचा शेवटचा ठोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात धोबी समाज कमी प्रमाणात आहे. कुठे धोबी, परीट, रजक या नावाने ओळखल्या जाते.

अन्याय : अहेरी-आलापल्ली समाजाची मागणी अहेरी : महाराष्ट्र राज्याचा शेवटचा ठोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात धोबी समाज कमी प्रमाणात आहे. कुठे धोबी, परीट, रजक या नावाने ओळखल्या जाते. धोबी समाज प्रामुख्याने हा समाज अस्वच्छ व्यवसाय करीत आहे. धोबी समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाचा नोकर भरतीत संधी मिळत नाही. त्यामुळे या समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी अहेरी-आलापल्ली येथील समाजाकडून केली जात आहे. विखुरलेल्या समाजबांधवांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य (परीट) धोबी सेवा मंडळ, अखिल वरठी परीट समाज, श्री संत गाडगे महाराज बहुद्देशीय विकास मंडळ लढा देत आहे. या तिन्ही संघटनांची नावे वेगळी असली, तरी ही मंडळे समाजाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. गत २५ वर्षांपासून संघटनाच्या समाजाच्या प्रगतीसाठी झटत आहेत. मात्र शासनाचे समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कपडे धुण्याचा व्यवसाय करणारा धोबी समाज देशभरात दोन प्रवर्गात आहे. देशातील १७ राज्यांमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा असलेला धोबी समाज अन्य ११ राज्यांमध्ये मात्र ओबीसी प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात धोबी समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होऊ शकली नाही. त्याचा फटका राज्यातील ३० लाख धोबी बांधवांना बसत आहे. भंडारा व बुलडाणा जिल्ह्यात १९६० पूर्वी हा समाज अनुसूचित जातींमध्येच होता. त्यांना सवलतीही मिळत होत्या. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात आला. त्यामुळे धोबी समाजावर फार मोठा अन्याय झाला. सरकारने ५ सप्टेंबर २००१ मध्ये तत्कालीन आमदार डी. एन. धांडे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती गठित केली. या समितीनेही धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्याची शिफारस केली होती. परंतु १४ वर्षांनंतरही राज्य सरकारने हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. सरकारने समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून समाजावरील अन्याय दूर करावा, येत्या हिवाळी अधिवेशणात आंदोलन करणार अशी माहिती अहेरी आलापल्ली धोबी समाजबांधव यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)