शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

काेराेनाकाळात घटले क्षयराेगाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : क्षयराेगाचा (टीबी) संसर्ग हाेऊनही काेराेनाच्या भीतीने अनेक रुग्ण या राेगाचे निदान करण्यासाठी रुग्णालयापर्यंत जात नाहीत. तसेच काेराेना काळात बहुतांश नागरिक मास्कचा वापर करीत हाेते. यामुळे काेराेना काळात क्षयरुग्णांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात क्षयराेगाचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळून येतात.काेराेनाच्या पूर्वी वर्षभरात साधारणत: १ हजार ८०० रुग्णांचे निदान हाेऊन त्यांच्यावर उपचार हाेत हाेते. आराेग्य विभागाने या राेगाबाबत जनजागृती केल्याने ग्रामीण भागातील नागरिकही या राेगाची लक्षणे दिसून आल्यानंतर उपचारासाठी उपकेंद्रातील परिचारिका, आशा वर्कर यांना कळवतात. जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्रे, प्राथमिक आराेग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यामध्ये उपचाराच्या सुविधा आहेत. तसेच एखाद्या खासगी डाॅक्टरकडे क्षयराेगाची लक्षणे असलेला रुग्ण गेल्यास त्याची तपासणी करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवितात. क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत. वर्षभरात हा आकडा १५०० पर्यंत पाेहाेचू शकताे. काेराेनाकाळापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. 

कशामुळे हाेतो क्षयराेग?

क्षयराेग हा मायक्राेबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूमुळे हाेतो. यामुळे फुफ्फुसाला बाधा निर्माण हाेते. क्षयराेग हा संसर्गजन्य राेग आहे. एक व्यक्ती दहा ते पंधरा व्यक्तींना संसर्ग करू शकते. क्षयराेगबाधित व्यक्ती बाेलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निराेगी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास त्याला या राेगाची बाधा हाेते. 

काय आहेत लक्षणे...

एखाद्या व्यक्तीला सतत दाेन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खाेकला असणे, वजन कमी हाेणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु सायंकाळी ताप येणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे आदी लक्षणे दिसून येतात. 

वेळीच उपचार झाल्यास जिवाला धाेका नाहीक्षयराेगावर सरकारी रुग्णालयांमध्ये अतिशय प्रभावी औषधाेपचार माेफत स्वरूपात उपलब्ध आहेत. क्षयराेगाचे वेळीच निदान हाेऊन उपचार झाल्यास हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. यासाठी सहा महिने औषध दिले जाते. सहा महिन्यांमध्ये हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. मात्र रुग्णाची राेगप्रतिकारक क्षमता अतिशय कमी असल्यास, त्याला एखादा जुना गंभीर राेग असल्यास किंवा क्षयराेगाचे निदान हाेण्यास उशीर झाल्यास जिवाला धाेका हाेऊ शकतो. 

५०० रुपये आहार भत्ता मिळतोक्षयराेगाने बाधित असलेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी शासनाकडून प्रति महिना ५०० रुपये आहार भत्ता दिला जातो. तेवढी रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम साधारणत: सहा महिन्यांपर्यंत दिली जाते. 

शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयराेगावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मात्र या राेगाचे निदान हाेण्यास विलंब हाेता कामा नये. १९ जुलै ते ३१ ऑक्टाेबर या कालावधीत सक्रिय रुग्ण शाेधमाेहीम व नियमित संनियंत्रण उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आशा वर्कर्स घराेघरी जाऊन भेट देऊन विचारणा करणार आहेत. क्षयराेगाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तीने तपासणी करून घ्यावी. - डाॅ. सचिन हेमके, जिल्हा क्षयराेग अधिकारी, गडचिराेली

 

टॅग्स :Healthआरोग्य