शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळात घटले क्षयराेगाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : क्षयराेगाचा (टीबी) संसर्ग हाेऊनही काेराेनाच्या भीतीने अनेक रुग्ण या राेगाचे निदान करण्यासाठी रुग्णालयापर्यंत जात नाहीत. तसेच काेराेना काळात बहुतांश नागरिक मास्कचा वापर करीत हाेते. यामुळे काेराेना काळात क्षयरुग्णांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात क्षयराेगाचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळून येतात.काेराेनाच्या पूर्वी वर्षभरात साधारणत: १ हजार ८०० रुग्णांचे निदान हाेऊन त्यांच्यावर उपचार हाेत हाेते. आराेग्य विभागाने या राेगाबाबत जनजागृती केल्याने ग्रामीण भागातील नागरिकही या राेगाची लक्षणे दिसून आल्यानंतर उपचारासाठी उपकेंद्रातील परिचारिका, आशा वर्कर यांना कळवतात. जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्रे, प्राथमिक आराेग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यामध्ये उपचाराच्या सुविधा आहेत. तसेच एखाद्या खासगी डाॅक्टरकडे क्षयराेगाची लक्षणे असलेला रुग्ण गेल्यास त्याची तपासणी करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवितात. क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत. वर्षभरात हा आकडा १५०० पर्यंत पाेहाेचू शकताे. काेराेनाकाळापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. 

कशामुळे हाेतो क्षयराेग?

क्षयराेग हा मायक्राेबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूमुळे हाेतो. यामुळे फुफ्फुसाला बाधा निर्माण हाेते. क्षयराेग हा संसर्गजन्य राेग आहे. एक व्यक्ती दहा ते पंधरा व्यक्तींना संसर्ग करू शकते. क्षयराेगबाधित व्यक्ती बाेलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निराेगी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास त्याला या राेगाची बाधा हाेते. 

काय आहेत लक्षणे...

एखाद्या व्यक्तीला सतत दाेन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खाेकला असणे, वजन कमी हाेणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु सायंकाळी ताप येणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे आदी लक्षणे दिसून येतात. 

वेळीच उपचार झाल्यास जिवाला धाेका नाहीक्षयराेगावर सरकारी रुग्णालयांमध्ये अतिशय प्रभावी औषधाेपचार माेफत स्वरूपात उपलब्ध आहेत. क्षयराेगाचे वेळीच निदान हाेऊन उपचार झाल्यास हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. यासाठी सहा महिने औषध दिले जाते. सहा महिन्यांमध्ये हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. मात्र रुग्णाची राेगप्रतिकारक क्षमता अतिशय कमी असल्यास, त्याला एखादा जुना गंभीर राेग असल्यास किंवा क्षयराेगाचे निदान हाेण्यास उशीर झाल्यास जिवाला धाेका हाेऊ शकतो. 

५०० रुपये आहार भत्ता मिळतोक्षयराेगाने बाधित असलेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी शासनाकडून प्रति महिना ५०० रुपये आहार भत्ता दिला जातो. तेवढी रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम साधारणत: सहा महिन्यांपर्यंत दिली जाते. 

शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयराेगावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मात्र या राेगाचे निदान हाेण्यास विलंब हाेता कामा नये. १९ जुलै ते ३१ ऑक्टाेबर या कालावधीत सक्रिय रुग्ण शाेधमाेहीम व नियमित संनियंत्रण उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आशा वर्कर्स घराेघरी जाऊन भेट देऊन विचारणा करणार आहेत. क्षयराेगाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तीने तपासणी करून घ्यावी. - डाॅ. सचिन हेमके, जिल्हा क्षयराेग अधिकारी, गडचिराेली

 

टॅग्स :Healthआरोग्य