शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तीन वर्षांत वाघ-बिबट्यांनी घेतला तब्बल 26 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे; परंतु पुन्हा पावसाळ्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात परत जात असत. मात्र, चार वर्षांपूर्वी देसाईगंज तालुक्यात दाखल झालेले वाघ हळूहळू जिल्ह्याच्या अनेक भागांत पसरून स्थायिक झाले आहेत.

गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वनाच्छादित गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला आहे. अलीकडच्या दोन वर्षांत तो अधिक वाढल्याचे दिसून येते. जानेवारी २०१९ पासूनच्या घटनांमध्ये या जिल्ह्यात २६ लाेकांचा वाघ व बिबट्यांनी बळी घेतला आहे. यामध्ये २१ जणांना वाघांनी, तर पाच जणांना बिबट्यांनी ठार केले. गडचिराेली जिल्ह्यात ७६ टक्के वनक्षेत्र आहेत. ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे; परंतु पुन्हा पावसाळ्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात परत जात असत. मात्र, चार वर्षांपूर्वी देसाईगंज तालुक्यात दाखल झालेले वाघ हळूहळू जिल्ह्याच्या अनेक भागांत पसरून स्थायिक झाले आहेत.२७ जानेवारी २०१९ राेजी आरमाेरी तालुक्याच्या उसेगाव येथील एका व्यक्तीला वाघाने ठार केल्याची पहिली घटना नोंदविल्या गेली. २० जानेवारी २०२२ राेजी आरमाेरी तालुक्याच्या कुरंझा येथे शेवटची व्याघ्रबळीची घटना घडली. गेल्या दोन महिन्यांत अशा घटनांची नोंद नसली तरी तीन वर्षांत २१ जणांचा वाघाने आणि ५ जणांचा बिबट्याने बळी घेतला. त्यात वन विभागाच्या क्षेत्रात १८, वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम)च्या क्षेत्रात ७, तर आलापल्ली वन्यजीव क्षेत्रातील एका घटनेचा समावेश आहे.

काेणत्या कारणांनी गेला बळी?-    गडचिराेली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात वनक्षेत्र असल्याने वनाेपजावर लाेकांचे जीवन अवलंबून आहे. माेहफूल वेचणी, सरपण गाेळा करणे, गुरे चारणे, तेंदूपत्ता संकलन, तसेच जंगलालगतीची शेती कसत असताना त्यांचा जंगलाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. सर्वाधिक बळी सरपण गाेळा करताना आणि शेतातील कामासाठी जात असताना किंवा शेतात कामे करीत असताना वाघांनी घेतला.-    देसाईगंज, गडचिराेली, आरमाेरी तालुक्यात आढळणारे वाघ आता आलापल्ली व सिराेंचापर्यंत सुद्धा पाेहाेचले आहेत.

किती जणांना मिळाले १५ लाख?वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २६ बळींपैकी आतापर्यंत २४ जणांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. मुलचेरा तालुक्यातील येल्ला व सिराेंचा तालुक्यातील पेंटिपाकातील बिबटबळीच्या कुटुंबाच्या अनुदानाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ