शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अवघ्या तीन महिन्यांत मोठ्यानंतर लहान भाऊही ठरला व्याघ्रबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 21:59 IST

Gadchiroli News सोमवारी गडचिरोली तालुक्याच्या कळमटोला गावात प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) हे शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील दोघांना मारल्याने निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न

गोपाल लाजुरकर

गडचिरोली : जिल्ह्यात वाघ- बिबट्यांचे हल्ले होण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी गडचिरोली तालुक्याच्या कळमटोला गावात प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) हे शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी मृतकाचा मोठा भाऊसुद्धा व्याघ्रबळी ठरला होता. एकाच कुटुंबातील दोन कर्ते पुरुष वाघाचे बळी ठरण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांसमोर आता वाघांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घरीच बसावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जीवाची जोखीम पत्करून जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतात जावे, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

गावालगतच्या शेतशिवारात स्वमालकीची गुरे चारत असताना प्रभाकर यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील कळमटोला येथे सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. प्रभाकर निकुरे हे सकाळी ११ वाजतानंतर आपली गुरे घेऊन अन्य चार गुराख्यांसोबत गावापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात गेले होते. ते दररोज दिभना मार्गावरील त्याच भागात गुरे चारायचे. सोमवारी जंगलालगत गुरे चारत असताना प्रभाकर निकुरे हे जंगलाच्या बाजूने उभे होते. याचवेळी वाघाने त्यांच्यावर झडप घेतली आणि त्यांना फरफटत ६० ते ७० मीटर अंतरावर नेले.

सोबतच्या गुराख्यांनी वेळीच याबाबतची माहिती गावात व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सायंकाळी मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. निकुरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. जंगलालगत गुरे चारू नये, असे वनविभागाकडून वारंवार सांगितले जात असतानाही लोक जुमानत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

मानेला पकडून सहज उचलून नेले

वाघाने हल्ला करताच जवळपास असणाऱ्या गुराख्यांनी आरडाओरड केली; परंतु, वाघाचा प्रतिकार करण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. निकुरे यांची मान पकडून वाघ त्यांना सहज उचलून घेऊन गेला, मात्र सहकारी गुराख्यांच्या ओरडण्यामुळे थोड्याच वेळात काही अंतरावर त्यांना टाकून वाघ जंगलात पळून गेला, तोपर्यंत प्रभाकर निकुरे यांचा जीव गेला होता.

कुटुंबावर दुसरा आघात

मृतक प्रभाकर निकुरे यांचे मोठे भाऊ खुशाल निकुरे हेसुद्धा गुरे चारत असतानाच २८ जुलै रोजी म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी धुंडेशिवणीपासून तीन किमी अंतरावरील पिपरटोल्याच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. प्रभाकर हे कळमटोला तर खुशाल हे धुंडेशिवणी येथे राहात होते. तीन महिन्यांत निकुरे कुटुंबावर वाघामुळे दुहेरी आघात झाला.

टॅग्स :Tigerवाघ