शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

विकासकामे प्राधान्याने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:29 IST

अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीकोणातून आपली कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचसोबत आवश्यक त्या प्रकरणी पाठपुरावा ठेवावा म्हणजे गडचिरोलीचे चित्र पालटेल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्दे खासदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना : दिशाच्या बैठकीत विविध कामे व योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीकोणातून आपली कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचसोबत आवश्यक त्या प्रकरणी पाठपुरावा ठेवावा म्हणजे गडचिरोलीचे चित्र पालटेल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’च्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, बाबुराव कोहळे आदी उपस्थिती होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुनिलकुमार पठारे यांनी सभेत सर्वांचे स्वागत केले. केंद्र शासनाच्या योजना तसेच केंद्र राज्य सहकार्यातून चालणाऱ्या विविध योजनांचा आढावा आजच्या सभेत घेण्यात आला.अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत व पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव आहेत. निधी प्राप्त झाल्यावर त्याचे बांधकाम होईल परंतू धोकादायक शाळा तातडीने पाडून घ्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंत्यांना यावेळी दिले. जारावंडी ते कसनसूर दरम्यान असलेला रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बस बंद झाली आहे. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा अशा सुचना खासदार नेते यांनी बांधकाम विभागास यावेळी दिल्या. सभेला विविध विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.११८ गावे उजळलीजिल्ह्यात वीज पुरवठा नसणाऱ्या गावांची संख्या २६७ इतकी आहे. यांच्या विद्युतीकरणासाठी नियोजन समितीने निधी देऊ केला आहे. यापैकी २१८ गावांचे विद्युतीकरण वीज वितरण कंपनी मार्फत होणार आहे. त्यातील ११८ गावांचे काम पूर्ण झाले.पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती अबंध निधी व तेंदू, बांबूतून झाल्या स्वयंपूर्णवित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना पैसा मिळतो. त्यात आरोग्य, शिक्षण व इतर बाबींवर खर्चाचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. या खेरीज ८० टक्के ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत पाच टक्के अबंध निधी प्राप्त होतो. तसेच तेंदू आणि बांबू लिलावातून देखील ग्राम पंचायतींना उत्पन्न प्राप्त होत आहे. यामुळे आता ग्रामपंचायती स्वंयपूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी शासनाकडे निधीची मागणी न करता गावपातळीवर शिक्षण तसेच आरोग्य कामांसाठी ग्रामपंचायतींनी स्वत:चा निधी खर्च करावा अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सभेत केली . खासदार नेते यांनीही ही सूचना चांगली असून पदाधिकारी व सरपंचानी या पध्दतीने कामे करावी असे सभेत सांगितले.ही गावे उजळलीअतिदुर्गम ४९ गावांमध्ये मेडाच्या माध्यमातून सौर उर्जेचा वापर करुन विद्युतीकरण प्रस्तावित आहे. यातील ४१ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. १०० गावांचे विद्युतीकरण मार्च अखेर पूर्ण करेल, असे सभेत सांगण्यात आले. या १०० पैकी ८३ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेंतर्गत सहा हजार आणि बीपीएल अंतर्गत २६ हजार अशा एकूण ३२ हजार मोफत जोडण्या दिल्या जातील.पेयजल योजनाग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी १८ गावांच्या योजनांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. या सर्व कामांच्या निविदा काढण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. मागील वर्षात ३६ कामांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी २० गावांमधील योजना पूर्ण झाल्या असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.