शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे प्राधान्याने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:29 IST

अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीकोणातून आपली कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचसोबत आवश्यक त्या प्रकरणी पाठपुरावा ठेवावा म्हणजे गडचिरोलीचे चित्र पालटेल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्दे खासदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना : दिशाच्या बैठकीत विविध कामे व योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीकोणातून आपली कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचसोबत आवश्यक त्या प्रकरणी पाठपुरावा ठेवावा म्हणजे गडचिरोलीचे चित्र पालटेल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’च्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, बाबुराव कोहळे आदी उपस्थिती होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुनिलकुमार पठारे यांनी सभेत सर्वांचे स्वागत केले. केंद्र शासनाच्या योजना तसेच केंद्र राज्य सहकार्यातून चालणाऱ्या विविध योजनांचा आढावा आजच्या सभेत घेण्यात आला.अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत व पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव आहेत. निधी प्राप्त झाल्यावर त्याचे बांधकाम होईल परंतू धोकादायक शाळा तातडीने पाडून घ्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंत्यांना यावेळी दिले. जारावंडी ते कसनसूर दरम्यान असलेला रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बस बंद झाली आहे. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा अशा सुचना खासदार नेते यांनी बांधकाम विभागास यावेळी दिल्या. सभेला विविध विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.११८ गावे उजळलीजिल्ह्यात वीज पुरवठा नसणाऱ्या गावांची संख्या २६७ इतकी आहे. यांच्या विद्युतीकरणासाठी नियोजन समितीने निधी देऊ केला आहे. यापैकी २१८ गावांचे विद्युतीकरण वीज वितरण कंपनी मार्फत होणार आहे. त्यातील ११८ गावांचे काम पूर्ण झाले.पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती अबंध निधी व तेंदू, बांबूतून झाल्या स्वयंपूर्णवित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना पैसा मिळतो. त्यात आरोग्य, शिक्षण व इतर बाबींवर खर्चाचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. या खेरीज ८० टक्के ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत पाच टक्के अबंध निधी प्राप्त होतो. तसेच तेंदू आणि बांबू लिलावातून देखील ग्राम पंचायतींना उत्पन्न प्राप्त होत आहे. यामुळे आता ग्रामपंचायती स्वंयपूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी शासनाकडे निधीची मागणी न करता गावपातळीवर शिक्षण तसेच आरोग्य कामांसाठी ग्रामपंचायतींनी स्वत:चा निधी खर्च करावा अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सभेत केली . खासदार नेते यांनीही ही सूचना चांगली असून पदाधिकारी व सरपंचानी या पध्दतीने कामे करावी असे सभेत सांगितले.ही गावे उजळलीअतिदुर्गम ४९ गावांमध्ये मेडाच्या माध्यमातून सौर उर्जेचा वापर करुन विद्युतीकरण प्रस्तावित आहे. यातील ४१ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. १०० गावांचे विद्युतीकरण मार्च अखेर पूर्ण करेल, असे सभेत सांगण्यात आले. या १०० पैकी ८३ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेंतर्गत सहा हजार आणि बीपीएल अंतर्गत २६ हजार अशा एकूण ३२ हजार मोफत जोडण्या दिल्या जातील.पेयजल योजनाग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी १८ गावांच्या योजनांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. या सर्व कामांच्या निविदा काढण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. मागील वर्षात ३६ कामांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी २० गावांमधील योजना पूर्ण झाल्या असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.