शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

पर्यटन स्थळांच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 22, 2016 01:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा, टिप्पागड, खोब्रामेंढा, वैरागड येथे जुने किल्ले व मंदिरे आहेत. या जुन्या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

शासन सूस्त : ऐतिहासिक किल्ले दुर्लक्षितगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा, टिप्पागड, खोब्रामेंढा, वैरागड येथे जुने किल्ले व मंदिरे आहेत. या जुन्या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मार्कंडा देवस्थानच्या जुन्या दगडांना रसायनाने धूण्यात आले. व सद्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील अन्य पुरातन वास्तूंची पडझड होत आहे. ऐतिहासिक किल्ल्याचीही दुरवस्था आहे.आरमोरी तालुक्यात वैरागड येथे १६ व्या शतकात चंद्रपूर येथील गोंड राजा बल्लाळशहा याने हिरे व सोन्याच्या रक्षणासाठी १२ एकर परिसरात किल्ल्याचे बांधकाम केले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याची तटबंदी उदध्वस्त झाली असून जुन्या मंदिरांचे दगडं पडत आहे. कुरखेडा तालुक्यात टिप्पागड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे नंद्यावर बसलेल्या शंकराची मूर्ती आहे. तसेच मोठा जुना तलाव असून या ठिकाणाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण होऊ शकते. परंतु या दृष्टिकोनातून आजवर शासनाने कधीही टिप्पागडच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही. तसेच खोब्रामेंढा या पर्यटन स्थळाच्याही विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्कंडा देवस्थान परिसरात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या निधीतून भक्तांसाठी निवारा उभारण्यात आला होता. परंतु या कामाला पुरातत्व विभागाने अडथळा आणून ते काम बंद पाडले. जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला मोठा वाव आहे. परंतु शासनाचे व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटन स्थळाचा विकास झाल्यास येथील अनेक बेरोजगारांना उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. (शहर प्रतिनिधी)नियोजनबध्द कृती आराखड्याची गरजगडचिरोली जिल्हा वन संपत्तीने नटलेला असून अनेक नद्या, नाल्यांमुळे जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जुने मंदिर आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची दूरवस्था झाली आहे. परिणामी सोयीसुविधेअभावी जिल्हाबाहेरील पर्यटक जिल्ह्यात फिरकत नाही. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकासहोण्यासाठी भाजप सेना युती सरकारने नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.