शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

पर्यटन स्थळांच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 22, 2016 01:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा, टिप्पागड, खोब्रामेंढा, वैरागड येथे जुने किल्ले व मंदिरे आहेत. या जुन्या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

शासन सूस्त : ऐतिहासिक किल्ले दुर्लक्षितगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा, टिप्पागड, खोब्रामेंढा, वैरागड येथे जुने किल्ले व मंदिरे आहेत. या जुन्या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मार्कंडा देवस्थानच्या जुन्या दगडांना रसायनाने धूण्यात आले. व सद्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील अन्य पुरातन वास्तूंची पडझड होत आहे. ऐतिहासिक किल्ल्याचीही दुरवस्था आहे.आरमोरी तालुक्यात वैरागड येथे १६ व्या शतकात चंद्रपूर येथील गोंड राजा बल्लाळशहा याने हिरे व सोन्याच्या रक्षणासाठी १२ एकर परिसरात किल्ल्याचे बांधकाम केले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याची तटबंदी उदध्वस्त झाली असून जुन्या मंदिरांचे दगडं पडत आहे. कुरखेडा तालुक्यात टिप्पागड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे नंद्यावर बसलेल्या शंकराची मूर्ती आहे. तसेच मोठा जुना तलाव असून या ठिकाणाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण होऊ शकते. परंतु या दृष्टिकोनातून आजवर शासनाने कधीही टिप्पागडच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही. तसेच खोब्रामेंढा या पर्यटन स्थळाच्याही विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्कंडा देवस्थान परिसरात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या निधीतून भक्तांसाठी निवारा उभारण्यात आला होता. परंतु या कामाला पुरातत्व विभागाने अडथळा आणून ते काम बंद पाडले. जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला मोठा वाव आहे. परंतु शासनाचे व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटन स्थळाचा विकास झाल्यास येथील अनेक बेरोजगारांना उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. (शहर प्रतिनिधी)नियोजनबध्द कृती आराखड्याची गरजगडचिरोली जिल्हा वन संपत्तीने नटलेला असून अनेक नद्या, नाल्यांमुळे जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जुने मंदिर आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची दूरवस्था झाली आहे. परिणामी सोयीसुविधेअभावी जिल्हाबाहेरील पर्यटक जिल्ह्यात फिरकत नाही. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकासहोण्यासाठी भाजप सेना युती सरकारने नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.