शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

-तर वाचले असते स्फोटातील अनेक पोलिसांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:14 IST

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआततायीपणा : भूसुरूंगरोधक वाहनाचा वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडे ३४ भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) १५ जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते, असा कयास लावल्या जात आहे.जिल्हा पोलीस दलाकडे नक्षलविरोधी अभियानासाठी २००७ मध्ये काही भूसुरूंग रोधक वाहने आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अशी एकूण ३४ वाहने गडचिरोलीपोलिसांना मिळाली आहेत. जिल्ह्यात १० उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली १० क्युआरटी पथक आहेत.नक्षलविरोधी मोहिमेत तातडीने कुठेही जाण्यासाठी या पथकाला नेहमी सज्ज असावे लागते. त्यामुळे या पथकांसाठी १० भूसुरूंग रोधक वाहने असणे आवश्यक असताना त्या दिवशी कुरखेडा येथे हे वाहन नव्हते. परिणामी अधिकाºयांच्या आदेशानुसार या पथकाला तातडीने खासगी वाहनातून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली त्या दादापूरकडे निघावे लागले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी घात केला.वास्तविक त्यांच्यासाठी भूसुरूंग रोधक वाहन उपलब्ध असते आणि त्यातून हे जवान गेले असते तर स्फोटाची झळ कमी प्रमाणात जाणवून एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते.भूसुरूंगरोधक वाहनांची क्षमता काय?नक्षलवाद्यांनी गेल्या १२ वर्षात ३ वेळा भुसूरूंग रोधक वाहने स्फोटात उडविली आहेत. त्यात झालेली वाहनांची हाणी पाहता या वाहनांची खरोखरच किती स्फोटक सहन करण्याची क्षमता आहे याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मे २०१७ मध्ये भामरागड-कोटी मार्गावर घडवून आणलेल्या स्फोटात भूसुरूंग रोधक वाहनाचे मोठे नुकसान होऊन दोन पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या वाहनांची स्फोटक सहन करण्याची क्षमता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.खबरीमुळे यशस्वी झाला नक्षलवाद्यांचा डावदादापूरमध्ये रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने जाळल्यानंतर पोलीस तिकडे जातील याचा अंदाज घेऊन जांभुळखेडा ते लेंढारीदरम्यानच्या छोट्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी आधीच भूसुरूंग पेरून ठेवले होते. पण जानेवारी महिन्यातच डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भूसुरुंग पेरला असू शकतो याची पुसटशीही कल्पना पोलिसांना आली नाही. त्यामुळे कुरखेडाचे एसडीपीओ यांनी शैलेश काळे यांनी क्युआरटी पथकाला तिकडे बोलविताच हे १५ जवान मागचापुढचा विचार न करता निघाले. पोलीस पथक तिकडे निघाल्याची माहिती कुरखेडा येथूनच खबरीकडून नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे तो खबरी कोण? याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसGadchiroliगडचिरोली