शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

समाजात विचार पेराल तर ५०० वर्षे टिकतील

By admin | Updated: January 13, 2017 00:44 IST

वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात.

ज्ञानेश महाराव यांचे प्रतिपादन : कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे विद्याभारती कन्या विद्यालयात व्याख्यानगडचिरोली : वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात. समाजात नीतीयुक्त माणसे निर्माण केल्यास ते ५० वर्ष पुरतील. त्याचप्रमाणे समाजात सामाजिकतेचे विचार पेरल्यास ते ५०० वर्षे टिकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी गुरूवारी केले. कमल-गोविंद स्मृतीप्रतिष्ठानच्या वतीने गो. ना. मुनघाटे यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालयात आयोजित ‘उठावा महाराष्ट्र देश’ व्याख्यानात महाराव बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार होते. यावेळी दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तथा कमल-गोविंद प्रतिष्ठानचे आमंत्रक प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, कमल-गोविंद प्रतिष्ठानचे संचालक अनिल मुनघाटे, लोकविज्ञान प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना मुनघाटे उपस्थित होत्या. याप्रसंगी पुढे बोलताना ज्ञानेश महाराव म्हणाले, समाज अद्यापही विचारांनी जागरूक झालेला नाही. डोक्यावरती काय घ्यायचे व डोक्यातून काय फेकायचे ते अद्यापही समाजाला कळलेले नाही. देशात माणसापेक्षा दगड मोठे होत आहेत, ही बाब देशासाठी धोकादायक असून असा देश कधीही मोठा होऊ शकत नाही. गेल्या ३० वर्षांपासून राज्यात लोकांमध्ये भ्रम पसरवून भ्रामक कल्पना व धार्मिक अवडंबर माजविला जात आहे. त्यामुळे माणसाला भावनेपेक्षा बुध्दीने अधिक विचार करणे गरजेचे आहे. मेंदूला केवळ दगड बनवून ठेवलेले चालणार नाही. दिशा शोधायला लागल्यास आयुष्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादनही ज्ञानेश महाराव यांनी केले. व्याख्यानाला कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान छायाचित्र प्रदर्शनीतील विजेत्यांसह प्रोत्साहन बक्षीस मिळविणाऱ्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक अनिल मुनघाटे तर आभार स्मिता लडके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)