शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

समाजात विचार पेराल तर ५०० वर्षे टिकतील

By admin | Updated: January 13, 2017 00:44 IST

वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात.

ज्ञानेश महाराव यांचे प्रतिपादन : कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे विद्याभारती कन्या विद्यालयात व्याख्यानगडचिरोली : वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात. समाजात नीतीयुक्त माणसे निर्माण केल्यास ते ५० वर्ष पुरतील. त्याचप्रमाणे समाजात सामाजिकतेचे विचार पेरल्यास ते ५०० वर्षे टिकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी गुरूवारी केले. कमल-गोविंद स्मृतीप्रतिष्ठानच्या वतीने गो. ना. मुनघाटे यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालयात आयोजित ‘उठावा महाराष्ट्र देश’ व्याख्यानात महाराव बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार होते. यावेळी दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तथा कमल-गोविंद प्रतिष्ठानचे आमंत्रक प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, कमल-गोविंद प्रतिष्ठानचे संचालक अनिल मुनघाटे, लोकविज्ञान प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना मुनघाटे उपस्थित होत्या. याप्रसंगी पुढे बोलताना ज्ञानेश महाराव म्हणाले, समाज अद्यापही विचारांनी जागरूक झालेला नाही. डोक्यावरती काय घ्यायचे व डोक्यातून काय फेकायचे ते अद्यापही समाजाला कळलेले नाही. देशात माणसापेक्षा दगड मोठे होत आहेत, ही बाब देशासाठी धोकादायक असून असा देश कधीही मोठा होऊ शकत नाही. गेल्या ३० वर्षांपासून राज्यात लोकांमध्ये भ्रम पसरवून भ्रामक कल्पना व धार्मिक अवडंबर माजविला जात आहे. त्यामुळे माणसाला भावनेपेक्षा बुध्दीने अधिक विचार करणे गरजेचे आहे. मेंदूला केवळ दगड बनवून ठेवलेले चालणार नाही. दिशा शोधायला लागल्यास आयुष्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादनही ज्ञानेश महाराव यांनी केले. व्याख्यानाला कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान छायाचित्र प्रदर्शनीतील विजेत्यांसह प्रोत्साहन बक्षीस मिळविणाऱ्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक अनिल मुनघाटे तर आभार स्मिता लडके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)