शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीची गोळी लागली असती तर एवढे दु:ख झाले नसते, वीरपत्नीची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 20:39 IST

नक्षलवाद्यांशी लढताना बंदुकीची गोळी लागून त्यांना वीरमरण आले असते तर एवढे दु:ख झाले नसते,

गडचिरोली : नक्षलवाद्यांशी लढताना बंदुकीची गोळी लागून त्यांना वीरमरण आले असते तर एवढे दु:ख झाले नसते, पण एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ज्या पद्धतीने नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले ते अतिशय क्लेशदायक आहे. आमचे संसार उद्ध्वस्त करणा-या त्या अधिका-याला पाठीशी न घालता त्यांना निलंबित करा, आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आर्त मागणी शहीद पोलीस जवानांच्या वीरपत्नींनी केली.गेल्या १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरूंग स्फोटात कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्या अधिनस्थ असलेल्या क्युआरटी पथकातील १५ जवान आणि त्यांना घेऊन जाणा-या खासगी मालवाहू वाहनाच्या चालकाला वीरमरण आले. त्या वेदनादायी घटनेच्या १५ दिवसानंतर दु:खातून थोडे स्वत:ला सावरत आठ शहीद जवानांच्या वीरपत्नी व एका जवानाच्या बहिणीसह इतर कुटुंबियांनी गुरूवारी (१६) पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. परंतु पोलीस अधीक्षक मुंबईला गेले असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एसडीपीओ काळे यांच्याबद्दलच्या तीव्र भावनांना वाट मोकळी केली.काळे यांची नुकतीच नंदुरबार येथे बदली करण्यात आली. पण त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई झाली नाही. याचा अर्थ पोलीस विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असे सदर वीरपत्नी म्हणाल्या. वास्तविक त्या शहीद जवानांच्या क्युआरटी पथकाला काही दिवसांपासून कमांडरच नव्हता. तो का नव्हता याचीही चौकशी झाली पाहीजे. नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया केल्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी पोलीस नेहमीच योग्य ती दक्षता घेतात. मग या घटनेच्या वेळी ती दक्षता का घेतली नाही? नक्षलवाद्यांनी गाड्या जाळल्यानंतर त्याचा पंचनामा करण्यासाठी तातडीने तिकडे येण्याची सूचना करणारे एसडीपीओ काळे यांना आपल्या जवानांच्या जीवाची काळजी नव्हती का? रस्ता मोकळा न करताच (बॉम्ब शोधक यंत्राने तपासून) क्यूआरटी पथकाला तातडीने बोलविण्याचे कारण काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विशेष म्हणजे ज्या मालवाहू वाहनाने क्युआरटी पथकाला नेण्यात आले ते वाहन यापूर्वीही वापरण्यात आले होते. धोकादायक परिस्थितीत असे वाहन वापरण्याची परवानगी एसडीपीओ काळे यांनी दिली कशी? याबद्दल त्यांना जाब विचारला पाहीजे असे त्या म्हणाल्या. सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास शहीदांच्या परिवाराला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ येईल, असे त्यांनी सांगितले.बुलडाणा, यवतमाळ, नागपुरातून शहीद कुटुंबीय दाखलआपल्या व्यथा मांडण्यासाठी आलेल्या वीरपत्नींमध्ये लिना किशोर बोभाटे रा.चुरमुरा जि.गडचिरोली, रेशमा आग्रमण राहाटे रा.तरोडा, जि.यवतमाळ, स्वाती सर्जेराव खारडे रा.देऊळगाव, जि.बुलडाणा, लिना भुपेश वालोदे रा.लाखनी, जि.भंडारा, माधुरी अमृत भदाडे रा.मौदा, जि.नागपूर, कल्पना पुरणशहा दुग्गा रा.भाकरोंडी जि.गडचिरोली, नलिनी लक्ष्मण कोडाप रा.एंगलखेडा, जि.गडचिरोली, सविता शानुदास मडावी रा.चिखली जि.गडचिरोली, मोहिनी प्रमोद भोयर रा.वडसा जि.गडचिरोली आदी वीरपत्नी तथा योगाजी हलामी रा.मोहगाव (सोनसरी) या अविवाहित जवानाची बहीण प्रभा नरेंद्र काटेंगे, त्यांची छोटी-छोटी मुले आणि कुटुंबातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.निरागस मुलांच्या चेह-यावरील भाव वेदनादायीशहीद जवानांमध्ये सर्वच जण तरुण होते. त्यांची छोटी-छोटी मुलेही आपल्या आईचे बोट धरून मृत पित्याच्या आत्म्याला न्याय देण्याच्या मागणीसाठी भर उन्हात पोहोचली होती. त्यांच्या चेह-यावरील निरागस भाव आणि पितृप्रेमाला कायमचे मुकून त्यांना उभे आयुष्य काढावे लागणार, हे चित्र वेदनादायी होते. बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यातून आलेल्या वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांशी शुक्रवारी भेट होणार आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व मुक्कामाची व्यवस्था पोलीस विभागाने करून माणुसकीचा परिचय दिला.- तर पोलीस दलाचे मनोबल ढासळेलया प्रकरणात एसडीपीओ काळे यांची चूक असल्याचे स्पष्ट दिसत असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता निव्वळ बदली करून त्यांना पाठीशी घालणे हा आमच्या दु:खावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा प्रकाराने नक्षलविरोधी अभियानात जीवाची बाजी लावून लढणाºया पोलीस जवानांचे मनोबळ ढासळेल. त्यांचा विश्वास आणि मनोबल कायम ठेवण्यासाठी चुका झालेल्यांना योग्य ती शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी वीरपत्नींनी केली.