शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाव नाही, तर तारण ठेवा ! धानासह विविध शेत मालासाठी शासनाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:02 IST

६ टक्के व्याजदर : बाजार समितींमध्ये गोदामाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतमालाचे दर बाजारात कमी असले किंवा भाव पडले असल्यास शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण ठेवून कर्ज प्राप्त करता येते. जेव्हा शेतमालाचे दर वधारतात, तेव्हा सदर माल शेतकऱ्यांना विक्री करता येतो. बाजार समितीद्वारा पणन विभागाच्या वतीने शेतमाल तारण योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो.

शेतमाल तारण योजनेत बाजारात शेतमालास भाव मिळत नसेल तेव्हा, शेतकऱ्यांना शेतमाल तारण ठेवता येतो व त्यांची निकड भागविता येते व बाजारात दरवाढ झाल्यानंतर शेतमाल विकता येतो व तारण कर्जाची परतफेड करता येते. या योजनेमध्ये पहिल्या सहा महिन्यांत ६ टक्के, नंतरच्या सहा महिन्यांत ८ टक्के व त्यानंतरच्या कालावधीसाठी १० टक्के व्याजाची आकारणी करण्यात येते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये गोदामाची व्यवस्था असल्याने अनेक शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.

काय आहे शासनाची शेतमाल तारण योजना?

  • कृषी उत्पन्न बाजार १ समितीमध्ये राज्य शासनाच्या पणन महामंडळाच्या सहकार्याने ही योजना राबविते व याद्वारे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के प्रमाणात व अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात येते.
  • याद्वारे शेतकऱ्याची निकड २ भागविली जाते व कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभघेतल्यास नुकसान होणार नाही

उपबाजार समित्यांमध्येही शेतमाल खरेदीची सोय आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असल्याने अनेक शेतकरी धान मळणीनंतर शेतमालाची विक्री करतात. निवडक शेतकरी शेतमाल साठवून ठेवतात. ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या जिल्ह्यात आहेत. सर्वच ठिकाणी शेतमाल तारण ठेवण्याची सोय आहे.

२४ तासांत कर्ज उपलब्ध केले जाते. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष लाभासाठी पणन महामंडळाच्या या योजनेत बाजार समितीचा सहभाग आहे. भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल विकता येतो. 

किती शेतकऱ्यांना लाभ?जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. मागील वर्षी गडचिरोली कृउबासमध्ये ११ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला. यंदा ३ शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.

या शेतमालासाठी योजनाया योजनेत धान पिकासह मूग, उडीद, सोयाबीन, तूर व हरभरा या शेतमालांचा समावेश करण्यात आला आहे. शेतमाल ठेवल्यापासून विक्रीपर्यंत गोदाम भाडे व इतर खर्च समितीद्वारा करण्यात येतो.

"शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यात शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा आहे. गडचिरोली कृउबासमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे."- नरेंद्र राखडे, सचिव, कृउबास, गडचिरोली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती