शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भाव नाही, तर तारण ठेवा ! धानासह विविध शेत मालासाठी शासनाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:02 IST

६ टक्के व्याजदर : बाजार समितींमध्ये गोदामाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतमालाचे दर बाजारात कमी असले किंवा भाव पडले असल्यास शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण ठेवून कर्ज प्राप्त करता येते. जेव्हा शेतमालाचे दर वधारतात, तेव्हा सदर माल शेतकऱ्यांना विक्री करता येतो. बाजार समितीद्वारा पणन विभागाच्या वतीने शेतमाल तारण योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो.

शेतमाल तारण योजनेत बाजारात शेतमालास भाव मिळत नसेल तेव्हा, शेतकऱ्यांना शेतमाल तारण ठेवता येतो व त्यांची निकड भागविता येते व बाजारात दरवाढ झाल्यानंतर शेतमाल विकता येतो व तारण कर्जाची परतफेड करता येते. या योजनेमध्ये पहिल्या सहा महिन्यांत ६ टक्के, नंतरच्या सहा महिन्यांत ८ टक्के व त्यानंतरच्या कालावधीसाठी १० टक्के व्याजाची आकारणी करण्यात येते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये गोदामाची व्यवस्था असल्याने अनेक शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.

काय आहे शासनाची शेतमाल तारण योजना?

  • कृषी उत्पन्न बाजार १ समितीमध्ये राज्य शासनाच्या पणन महामंडळाच्या सहकार्याने ही योजना राबविते व याद्वारे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के प्रमाणात व अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात येते.
  • याद्वारे शेतकऱ्याची निकड २ भागविली जाते व कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभघेतल्यास नुकसान होणार नाही

उपबाजार समित्यांमध्येही शेतमाल खरेदीची सोय आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असल्याने अनेक शेतकरी धान मळणीनंतर शेतमालाची विक्री करतात. निवडक शेतकरी शेतमाल साठवून ठेवतात. ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या जिल्ह्यात आहेत. सर्वच ठिकाणी शेतमाल तारण ठेवण्याची सोय आहे.

२४ तासांत कर्ज उपलब्ध केले जाते. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष लाभासाठी पणन महामंडळाच्या या योजनेत बाजार समितीचा सहभाग आहे. भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल विकता येतो. 

किती शेतकऱ्यांना लाभ?जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. मागील वर्षी गडचिरोली कृउबासमध्ये ११ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला. यंदा ३ शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.

या शेतमालासाठी योजनाया योजनेत धान पिकासह मूग, उडीद, सोयाबीन, तूर व हरभरा या शेतमालांचा समावेश करण्यात आला आहे. शेतमाल ठेवल्यापासून विक्रीपर्यंत गोदाम भाडे व इतर खर्च समितीद्वारा करण्यात येतो.

"शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यात शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा आहे. गडचिरोली कृउबासमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे."- नरेंद्र राखडे, सचिव, कृउबास, गडचिरोली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती