शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

कोंदावाही गावाची आदर्श बांबू ग्रामकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:31 IST

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत बांबू हस्तकला व उपजीविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील कोंदावाही या गावाची ‘आदर्श बांबू ग्राम’कडे वाटचाल सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : एसटीआरसीचा विशेष उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत बांबू हस्तकला व उपजीविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील कोंदावाही या गावाची ‘आदर्श बांबू ग्राम’कडे वाटचाल सुरू झाली आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन ५ आॅगस्ट रोजी सोमवारला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उमेदच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन प्रमुख चेतना लाटकर, एसटीआरसीचे आशिष घराई आदी मान्यवर उपस्थित होते.बांबूला गरीबाचे सोने म्हटले जाते. हे सोने गडचिरोली जिल्ह्यात विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. कोंदावाही हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर दुर्गम व विकसनशील असे गाव आहे. या गावामध्ये एसटीआरसी बांबूपासून आदर्श बांबू ग्राम निर्माण करीत आहे. बांबूच्या बल्कोवा, तुरडा, मानवले, कटांगा अशा संकरित रोपांची २०० हेक्टर जागेत लागवड करण्यात येत आहे. यासाठी गडचिरोली वनविभागाची विशेष मदत मिळत आहे. सुमारे एक लक्ष रोपांचे उद्दिष्ट असून चांगल्या प्रजातीचे रोप अडीच ते तीन वर्षांत विक्रीसाठी व हस्तकलेसाठी कोंदावाही गावातून उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे या गावाला बांबू विक्रीतून वाढीव दर मिळून गावाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या ठिकाणी स्टिकटस या प्रजातीचे रोप लावून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनीही वृक्षारोपण केले.बांबू हस्तकलेतून रोजगार निर्मिती करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रातर्फे कोंदावाही गावातील सात युवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हे युवक आता गावातील महिला व इतर युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. या गावामध्ये विशेष उपकरणे असलेले कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरचे सुद्धा उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बांबू कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. या वस्तूंचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. सदर गावाला बांबू टूरिझमच्या दिशेने नेण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापासून गावाला अधिक सक्षम रोजगाराची साधने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला नागपूरचे प्रा.कमलेश माडुरवार उपस्थित होते. त्यांनी बांबू संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटीआरसीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी अशिष भराई यांनी केले. त्यांनी बांबू उपजीविका कार्यक्रमाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन व नियोजन एसटीआरसीचे वैज्ञानिक अधिकारी रंजन पांढरे यांनी केले. आभार ग्रामसभा अध्यक्ष देवाजी पदा यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गावाची-जिल्हाधिकारीशासन व प्रशासन नागरिकांच्या व गावाच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावाचे योगदान महत्त्वाचे आहे. सोबत ग्रामस्थांमध्ये आवडही निर्माण झाली पाहिजे. शासन व प्रशासनाने आणलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील गावाची तितकीच आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी बांबू हस्तकला व बांबू उपजीविकेबाबत माहिती जाणून घेतली. बांबू वस्तूंचे प्रकार, त्याची विक्री, उपाययोजना व किंमत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. वस्तूंचे डिझाईन व त्यावरील संशोधनावर सुद्धा त्यांनी भाष्य केले. मागील काही भेटीमध्ये एसटीआरसीच्या मुख्य कार्यक्रम अधिकाºयासोबत झालेल्या चर्चेमधून सदर केंद्राच्या वतीने गडचिरोलीतील लोकांसाठी चांगला उपक्रम सुरू असल्याचे दिसून आले. एसटीआरसी लोकांसाठी वेगवेगळ्या उपजीविका कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळा पायंडा पुढे आणत आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र व कोंदावाहीवासीयांचे कौतुक केले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली