शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्रामसभेला मिळणार पुरस्कार

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढावी त्याचबरोबर ग्रामसभा कार्यक्षम पद्धतीने काम कराव्या यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रथमच आदर्श ग्रामसभा पुरस्कार देऊन

गडचिरोली : ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढावी त्याचबरोबर ग्रामसभा कार्यक्षम पद्धतीने काम कराव्या यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रथमच आदर्श ग्रामसभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा होते. सदर पैशाचे नियोजन करण्याची व गावाचा विकास करण्याची फार मोठी जबाबदारी ग्रामसभेवर आहे. मात्र बहुतांश नागरिक ग्रामसभांना उपस्थित राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेतले जात नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांचा ग्रामसभेतील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने यावर्षीपासून प्रथमच आदर्श ग्रामसभा स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची यासाठी निवड केली जाणार आहे. पुरस्कारासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती तालुक्यातील एका ग्रामसभेची निवड करून सदर प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करेल. जिल्हा स्तरीय समिती पाहणी करून जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट ग्रामसभांचे प्रस्ताव आदर्श ग्रामसभा पुरस्कारासाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणार आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. आदर्श ग्रामसभेची निवड करताना ग्रामसभेची उपस्थिती, ग्रामसभेपूर्वी करण्यात येणारी प्रसिद्धी, ग्रामसभेपूर्वी वॉर्डाची सभा, महिला ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. आदर्श ग्रामसभा म्हणून निवड झाल्यास सदर ग्रामपंचायतीला एक लाख रूपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श ग्रामसभा पुरस्कारामुळे नागरिकांची ग्रामसभेतील उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)