शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

जनावरांसाठी साडेचार लाख लस उपलब्ध

By admin | Updated: June 22, 2017 01:37 IST

पावसाळ्यात प्रामुख्याने बैल व गायींना घटसर्प, एकटांग्या व शेळ्या तसेच कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाळ्यात प्रामुख्याने बैल व गायींना घटसर्प, एकटांग्या व शेळ्या तसेच कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात. या आजारांमुळे जनावर दगावण्याची शक्यता राहते. या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे ४ लाख ४४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीबरोबरच शेतकरी पशुुपालनाचाही व्यवसाय करतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पशुंचीही संख्या अधिक आहे. पाळीव पशुंमध्ये प्रामुख्याने बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांचा समावेश आहे. पावसाळ्यात या जनावरांना विविध रोगांचा संसर्ग होतो. जनावरांना संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पशु संवर्धन विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापुर्वी लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून घटसर्प रोगाच्या ८४,००० डोजेस, एकटांग्या ९६,००० डोजेस बकऱ्यांसाठी असलेले पीपीआर ८५,०००डोजेस व कोंबड्या रोगावर प्रतिबंधात्मक असलेले आरडी ही लस १ लाख ७९ हजार ५०० डोजेस उपलब्ध झाल्या आहेत. औषधसाठा ग्रामीण स्तरावर असलेल्या पशु वैद्यकीय रूग्णालयांना पुरविण्यात आला आहे.