शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gadchiroli; ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:30 IST

तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.

ठळक मुद्देमिरची तोडणीच्या कामासाठी गेले होते तेलंगणाततेलंगणा ते गोंदिया प्रवास

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर वाहतुकीची साधने बंद झाली. त्यामुळे कामाच्या शोधात गेलेले मजूर त्याच ठिकाणी अडकल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.प्रवासादरम्यान आरमोरी येथे पोहोचल्यानंतर युवारंगच्या सदस्यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मजूर आपले कुटुंब घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगली येथील ३५ मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. मिरची तोडाईचे काम सुरू असताना जगात कोरोनाचे संकट घोंगवायला सुरूवात झाली आणि हे संकट टाळण्यासाठी खबरदारी म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी मिरची तोडाईचा रोजगार बंद झाला. हाताला मिळणारे कामही थांबले. लॉकडाऊनमुळे राज्यातील प्रवासीह वाहतूकही बंद झाली. १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे संचारबंदी असल्याने एवढे दिवस रिकामे बसून खाण्यापेक्षा आपल्या गावाला गेलेले बर, असा निर्णय घेऊन ३५ मजूर तेलंगणा राज्यातून २५ मार्चला पायीच या प्रवासाला निघाले. डोक्यावर सामानाचे गाठोळे आणि कडाक्याच्या उन्हात तेलंगणा ते गोंदिया असा प्रवास सुरू झाला. दिवसभर प्रवास करायचा आणि सायंकाळ झाली तर मुक्काम करायचा. पुन्हा सकाळी प्रवासाला सुरूवात करायची, अशी त्यांची दिनचर्या.तेलंगणा राज्यातून पायी निघालेले हे ३५ मजूर शेकडो किमीचा प्रवास करीत २९ मार्चला आरमोरीत पोहोचले. ही बाब युवारंगच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी या मजुरांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली. थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा गोंदियासाठी प्रवासाला सुरूवात केली. ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीचा प्रवास थक्क करणारा होता.कोरोनाच्या संकटामुळे रोजीरोटीच्या शोेधात गेलेल्या मजुरांवर पायी प्रवास करण्याची नामुष्की ओढावली. अद्यापही चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणात अडकून पडले आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस