शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

Corona Virus in Gadchiroli; ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:30 IST

तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.

ठळक मुद्देमिरची तोडणीच्या कामासाठी गेले होते तेलंगणाततेलंगणा ते गोंदिया प्रवास

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर वाहतुकीची साधने बंद झाली. त्यामुळे कामाच्या शोधात गेलेले मजूर त्याच ठिकाणी अडकल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.प्रवासादरम्यान आरमोरी येथे पोहोचल्यानंतर युवारंगच्या सदस्यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मजूर आपले कुटुंब घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगली येथील ३५ मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. मिरची तोडाईचे काम सुरू असताना जगात कोरोनाचे संकट घोंगवायला सुरूवात झाली आणि हे संकट टाळण्यासाठी खबरदारी म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी मिरची तोडाईचा रोजगार बंद झाला. हाताला मिळणारे कामही थांबले. लॉकडाऊनमुळे राज्यातील प्रवासीह वाहतूकही बंद झाली. १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे संचारबंदी असल्याने एवढे दिवस रिकामे बसून खाण्यापेक्षा आपल्या गावाला गेलेले बर, असा निर्णय घेऊन ३५ मजूर तेलंगणा राज्यातून २५ मार्चला पायीच या प्रवासाला निघाले. डोक्यावर सामानाचे गाठोळे आणि कडाक्याच्या उन्हात तेलंगणा ते गोंदिया असा प्रवास सुरू झाला. दिवसभर प्रवास करायचा आणि सायंकाळ झाली तर मुक्काम करायचा. पुन्हा सकाळी प्रवासाला सुरूवात करायची, अशी त्यांची दिनचर्या.तेलंगणा राज्यातून पायी निघालेले हे ३५ मजूर शेकडो किमीचा प्रवास करीत २९ मार्चला आरमोरीत पोहोचले. ही बाब युवारंगच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी या मजुरांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली. थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा गोंदियासाठी प्रवासाला सुरूवात केली. ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीचा प्रवास थक्क करणारा होता.कोरोनाच्या संकटामुळे रोजीरोटीच्या शोेधात गेलेल्या मजुरांवर पायी प्रवास करण्याची नामुष्की ओढावली. अद्यापही चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणात अडकून पडले आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस