शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रेताच्या प्रवासासाठी सरसावले शेकडो हात

By admin | Updated: October 27, 2015 01:31 IST

श्रीमंत राजे विश्वेश्वराव आत्राम यांच्या दातृत्वाचे अनेक प्रसंग अहेरीकरांनी अनुभवले आहेत. त्यांच्या दातृत्वाची ख्याती

अहेरी : श्रीमंत राजे विश्वेश्वराव आत्राम यांच्या दातृत्वाचे अनेक प्रसंग अहेरीकरांनी अनुभवले आहेत. त्यांच्या दातृत्वाची ख्याती विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली होती. त्यांच्या संस्कारातून अहेरी गावाची जडणघडण झाली. हे संस्कार आजही अहेरीच्या मातीत रूजलेले आहेत. जेव्हाजेव्हा गरजवंतांना मदतीचा हात देण्याची वेळ येते, तेव्हा या गावातील शेकडो नागरिक तेवढ्याच तत्परतेने मदतीसाठी धावून जातात. याचा प्रत्यंतर रविवारी अहेरीत आला.भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गाव असलेल्या बिनागुंडा येथील अशोक कोहला तिम्मा हा २० वर्षीय आदिवासी युवक अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याचे रुग्णालयात निधन झाले. मृतकासोबत त्याचा लहान भाऊही आला होता. भावाच्या मृत्यूची बातमी त्याला कळताच तो पुरता खचून गेला. शवविच्छेदनासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या खरेदीसाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते, आपल्या भावाचा मृतदेह वाहनातून बिनागुंडा येथे न्यावा लागणार आहे. याची माहिती त्याला देण्यात आली. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो सुन्न अवस्थेत बसून होता. ही बाब अहेरी, आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्त्यांना कळली. त्याच्या लहान भावाला धीर देण्यासाठी शेकडो हात धावून आले. हेल्पींग हॅन्डस अहेरी, फ्रेन्डस क्लब नवदुर्गा मंडळ आलापल्ली, महेबुबनगर चहा सेंटरचे नियमित ग्राहक व मित्रमंडळ, वन विभाग आलापल्लीचे दोन वनपरिक्षेत्राधिकारी व अहेरीच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परतेने आर्थिक मदतीसाठी रक्कम गोळा केली. शवचिच्छेदनाचा तसेच अहेरी ते बिनागुंडा प्रेत नेण्यासाठी येणाऱ्या वाहनाच्या खर्चाचा भाग उचलण्याची तयारी दाखविले. तसेच मृतक अशोकच्या भावाजवळही काही रक्कम सोपविण्यात आली. अहेरीच्या वैकुंठ रथाद्वारे त्याचे शव बिनागुंडा गावाकडे मार्गस्थ करण्यात आले.भामरागड पोलीस ठाण्याच्या मदतीने भामरागड ते लाहेरीपर्यंत वाहनाने त्याचा मृतदेह पाठविण्यात आला. लाहेरीपासून १८ किमी अंतर असलेल्या बिनागुंडाकडे मृतदेह सायकलवर खाट बांधून तर काही ठिकाणी बैलबंडीतून नेण्यात आला. अखेरीस हा मृतदेह बिनागुंडाला पोहोचविला. अहेरी व आलापल्लीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह त्याच्या गावापर्यंत जाऊ शकला, याचे समाधान मदत करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. अहेरीच्या मातीचा हा सुगंध कायम असाच विविध प्रसंगात दरवळत राहो, अशी भावना यावेळी मदतकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)