शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

शेकडो हेक्टरवरील धानाला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते.

ठळक मुद्देधानपीक कुजले : सखल भागातील धानाची परिस्थिती गंभीर, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात तब्बल सहा दिवस पाऊस आणि पुराच्या पाण्याने थैमान घातले. पुराचे पाणी धानपिकात शिरल्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते. त्यामुळे ते आता करपल्यासारखे झाले आहे. तसेच पुराच्या पाण्याची गाळ धान पिकावर साचली आहे. आता पावसाने उसंत घेतल्याने पानांवर साचलेले गाळ कायम राहणार आहे. याचा मोठा फटका धानपिकाला बसण्याची शक्यता आहे. कधीकधी पाण्याअभावी धानपीक करपते. तर कधी पुरामुळे फटका बसते.नुकसानीचे पंचनामे होणारसहा दिवस असलेल्या पुरामुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. अजूनपर्यंत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. मात्र महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा केला जाईल. त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी दिली.

टॅग्स :floodपूरagricultureशेती