शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:14 IST

संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : धानपीक पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.मागील १५ ते २० दिवसांत गाढवी नदी तीन ते चार वेळा फुगली. पाणीपातळी वाढल्याने परिसरातील धानपीक पाण्याखाली आले. याचा परिणाम धानपिकाच्या वाढीवर होत आहे. काही शेतकऱ्यांनी धानपिकाची नुकतीच रोवणी केली. मात्र ही रोवणीसुद्धा पाण्यात बुडाल्याने सडून जाण्याची तसेच पाण्यासोबतच्या वाळूमातीसह वाहून जाण्याची शक्यता आहे. काही सखल भागातील शेतातून पाण्याचा अनैसर्गिक प्रवाह तयार झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुरूवातीच्या टप्प्यात पाऊस पडत नसल्याने रोवणीयोग्य धानपºहे करपत असताना वरूणराजाने जबरदस्त हजेरी लावली. पावसामुळे रोवणी पूर्ण होण्यास मदत झाली. परंतु अतिपावसामुळे सखल भागातील शेतजमिनीतील रोवणीचे काम अद्यापही प्रलंबित आहे. गेल्या २० दिवसांपासून सर्वत्र पाणीचपाणी आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस होत असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी रोवणी खोळंबली आहे.काही ठिकाणी धान रोवणीचे काम सुरू आहे. दुसरीकडे रोवणी झालेल्या शेतात पाणी साचल्यामुळे धानपिकाची वाढ होत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढवी नदी फुगली असून एकलपूर-विसोरा, शंकरपूर-चोप मार्गावरील नाले ओसंडून वाहत आहेत. विसोरा-शंकरपूर मार्गालालगतच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीतील धानपीक पाण्यात बुडाले आहे. शंकरपूरवरून चोपला जाताना दोन्ही बाजूच्या बहुतांश शेतजमिनींना आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.जिकडेतिकडे पाणीचपाणी पसरले आहे. शंकरपूर-चोप मार्गावरील नाल्यावर पाणी सोडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर