शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:14 IST

संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : धानपीक पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.मागील १५ ते २० दिवसांत गाढवी नदी तीन ते चार वेळा फुगली. पाणीपातळी वाढल्याने परिसरातील धानपीक पाण्याखाली आले. याचा परिणाम धानपिकाच्या वाढीवर होत आहे. काही शेतकऱ्यांनी धानपिकाची नुकतीच रोवणी केली. मात्र ही रोवणीसुद्धा पाण्यात बुडाल्याने सडून जाण्याची तसेच पाण्यासोबतच्या वाळूमातीसह वाहून जाण्याची शक्यता आहे. काही सखल भागातील शेतातून पाण्याचा अनैसर्गिक प्रवाह तयार झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुरूवातीच्या टप्प्यात पाऊस पडत नसल्याने रोवणीयोग्य धानपºहे करपत असताना वरूणराजाने जबरदस्त हजेरी लावली. पावसामुळे रोवणी पूर्ण होण्यास मदत झाली. परंतु अतिपावसामुळे सखल भागातील शेतजमिनीतील रोवणीचे काम अद्यापही प्रलंबित आहे. गेल्या २० दिवसांपासून सर्वत्र पाणीचपाणी आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस होत असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी रोवणी खोळंबली आहे.काही ठिकाणी धान रोवणीचे काम सुरू आहे. दुसरीकडे रोवणी झालेल्या शेतात पाणी साचल्यामुळे धानपिकाची वाढ होत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढवी नदी फुगली असून एकलपूर-विसोरा, शंकरपूर-चोप मार्गावरील नाले ओसंडून वाहत आहेत. विसोरा-शंकरपूर मार्गालालगतच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीतील धानपीक पाण्यात बुडाले आहे. शंकरपूरवरून चोपला जाताना दोन्ही बाजूच्या बहुतांश शेतजमिनींना आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.जिकडेतिकडे पाणीचपाणी पसरले आहे. शंकरपूर-चोप मार्गावरील नाल्यावर पाणी सोडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर