शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कुरखेडा एसडीओ कार्यालयावर धडकले शेकडो शेतकरी

By admin | Updated: December 6, 2015 01:16 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने कुरखेडा व कोरची या तालुक्यातील बहुतांश धानपीक करपले आहे.

दुष्काळ घोषित करा : आदिवासी विद्यार्थी संघाचा पुढाकार कुरखेडा : यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने कुरखेडा व कोरची या तालुक्यातील बहुतांश धानपीक करपले आहे. त्यामुळे शासनाने हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषीत करून विविध योजनांचा लाभ द्यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात कुरखेडा उपविभागीय कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला. कुरखेडा, कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये मदत जाहीर करावी, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील लोडशेडिीग बंद करून घरगुती वीज बिल पूर्ववत तीन महिन्यांचे द्यावे, तलाव व बोड्यांचे खोलीकरण करावे, तसेच दुरूस्ती करावी, बीपीएल यादीचा पुनर्सर्वे करावे करावा, अतिक्रमणाचे पट्टे व सामुहिक वनहक्क दावे मंजूर करावे, पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रत्येक शेतकऱ्याला बोअरवेल व विहीर खोदून द्यावी, सौरउर्जेवरील मोटारपंप लावून द्यावे, बँकांनी दिलेले कर्ज माफ करावे, धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समविष्ट करू नये, २०१०-११ मध्ये सडलेल्या धानाची संस्थांकडून वसुली करू नये, प्रत्येक मार्गाचे डांबरीकरण करून उखडलेले रस्ते दुरूस्त करावे आदी मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कुरखेडा व कोरची तालुक्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, कामगार सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रविण मडावी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)