शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

मानवाधिकार आयोगाकडून दखल

By admin | Updated: January 21, 2016 00:18 IST

२३ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आलापल्लीवरून स्वगावी गट्टेपल्लीकडे दुचाकीने जात असताना चंद्रा व गट्टेपल्लीच्या ...

बिरसू आत्राम मारहाण प्रकरण : १ फेब्रुवारीला धरणे आंदोलनगडचिरोली : २३ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आलापल्लीवरून स्वगावी गट्टेपल्लीकडे दुचाकीने जात असताना चंद्रा व गट्टेपल्लीच्या गावाच्या दरम्यान सीआरपीएफ जवानांनी रस्त्यात थांबायला लावून विनाकारण बिरसू आत्राम या तरूणाला मारहाण केली होती. याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल त्यांनी घेतली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष आत्राम व पीडित युवक बिरसू आत्राम यांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माहिती देताना बिरसू आत्राम म्हणाला, सिक्युलर युवर लाईफ या खासगी कंपनीच्या सेमिनारसाठी मी २० सप्टेंबर २०१५ ला आलापल्लीला आलो होतो. सेमिनार आटोपल्यानंतर एमएच-३३-के-८०६४ क्रमांकाच्या दुचाकीने माझा मित्र मिथून मडावी याला चंद्रा या गावी सोडलो. त्यानंतर गट्टेपल्लीकडे निघालो. दीड किमी अंतरावर पोहोचताच जंगल परिसरात लपून बसलेल्या ६० ते ७० च्या संख्येत असलेल्या सीआरपीएफ जवानांनी थांबण्यास सांगितले. मी थांबताच जवानांनी माझ्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात एक गोळी माझ्या हाताला लागल्याने मी जखमी झालो. त्यानंतर पोलिसांनी मला पेरमिली आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार केला. या पोलिसांनी तेथील डॉक्टर गणेश मडावी यांना सदर युवक दुचाकीवरून पडल्याचे दवाखान्यात सांगितले. त्यानंतर सायंकाळी पेरमिली पोलीस ठाण्याच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये रात्रभर ठेवले. सदर घटनेबाबत कुणालाही सांगायचे नाही, अशी धमकीही पोलिसांनी मला दिली, असेही बिरसू आत्राम यांनी यावेळी सांगितले. दोन दिवसांनी सीआरपीएफ जवान माझ्या घरी आले व मला १० हजार रूपये देऊन झालेल्या प्रकाराची माहिती कुणालाही द्यायची, अशी तंबीही दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नाही म्हणून १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहे, असे आत्राम म्हणाले.