शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गारपिटीने उन्हाळी धानाचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य झाले आहे. अशातच रविवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीठ पाऊस झाला. सोबतच वादळी सुटले.

ठळक मुद्देवादळासह पाऊस : झरी, फरी, शिवराजपूरसह अनेक गावांना बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : रविवारी रात्री झालेल्या वादळ व गारपिटीमुळे देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर, उसेगाव, फरी या गावांमधील धान पिकाचे लोंब गळून पडले. त्यामुळे धानाचा सडा बांधीत पडला आहे. धानपीक निघण्याच्या स्थितीत असताना गारपिटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य झाले आहे. अशातच रविवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीठ पाऊस झाला. सोबतच वादळी सुटले.गारपीट व वादळामुळे धानाचे लोंब गळून पडले. परिपक्व झालेल्या धानाचा सडा बांध्यांमध्ये पसरला होता. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघणे कठीण आहे. हातात आलेले पीक नष्ट झाले असल्याचे बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तेलंगणा राज्यातून आलेले मजूर शाळांमध्ये थांबले आहेत. पावसामुळे त्यांचे हाल झाले.लोंबाला १० टक्केच धान शिल्लकदेसाईगंजचे तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम यांनी प्रत्यक्ष धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी धानाच्या लोंबाला केवळ १० टक्केच धान शिल्लक असल्याचे सांगितले. उन्हाळी धानाला सरासरी २५० पेक्षा अधिक धान राहतात. गारपीठीमुळे आता लोंबाला केवळ १० ते २० एवढेच धान शिल्लक आहेत. केवळ १० टक्के धान शिल्लक असल्याने एवढ्या धानासाठी धानाची कापणी, बांधणी व मळणी करणे अशक्य आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या धानाच्या पिकात जनावरे शिरवल्याशिवाय पर्याय नाही.गारपीठीने नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती रोशनी पारधी, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, तहसीलदार डी. टी. सोनवाने, मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम आदी उपस्थित होते.रविवारी पहाटे अवकाळी पाऊसगडचिरोली : रविवारी रात्री व पहाटेच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाला. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यामुळे अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. आष्टी परिसरात सकाळी ८ वाजतापासून वादळवाºयासह पाऊस झाला. आलापल्ली परिसरातही सकाळीच पाऊस झाल्याने आलापल्ली येथील बाजारातील गर्दी कमी झाली. एटपपल्ली तालुक्यातही पाऊस झाला. गावाबाहेरच्या झोपड्यांमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या मजुरांचे मोठे हाल झाले. धानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने रात्री ३ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला हे एमएसईबीचे अधिकारी सांगत नाही. त्यामुळे नागरिकांना केवळ वीज पुरवठा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते. मुलचेरा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. आष्टी परिसरातील मार्र्कंडा कं. ते मुलचेरा मार्गावर झाडे पडली. जेसीबीच्या सहाय्याने सदर झाडे बाजुला करून मार्ग मोकळा करण्यात आला. मानापूर देलनवाडी परिसरातही वादळी पाऊस झाल्याने रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता.भाकरोंडी परिसरात ७ मे रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलु उडून गेले. भांसी येथील नागरिक शामराव सिताराम अलाम, ऋषी आत्राम, आशा अलाम व भाकरोंडी येथील वनिता प्रमोद जाळे यांच्या घरावरील कवेलु उडून गेल्याने नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस