शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मध निर्मितीतून सक्षमीकरणाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

सालमारा या पेसा गावातील अशिक्षित, गरीब, गरजू नऊ बचत गटातील विविध जाती, धर्मातील महिलांना तीन लाख रूपये तीन वर्षाकरिता देण्यात आले. यातून महिलांनी मधनिर्मिती केंद्राची स्थापना केली. याकरिता २० पेट्या खरेदी केल्या. मधमाशांचे पोळे आणून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक महिलांकडे सोपविण्यात आली. मधमाशांना पुष्परस मिळत नसल्याने सध्या बेसनपाणी व साखर खाद्य म्हणून दिल्या जात आहे.

ठळक मुद्देसालमारा येथील महिलांचा व्यवसाय : ग्रामपंचायतीकडून बचत गटांना तीन लाखांचा निधी वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : पुरेशी शैक्षणिक आणि आर्थिक सामर्थ्य नसलेले सालमारा या पेसा गावातील संपूर्ण नऊ बचत गटाच्या महिलांनी मध निर्मिती केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांची महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. पुरूषांप्रमाणे बाजारपेठेतील देवाणघेणाव व व्यावसायिक संधी जोगीसाखरा गट ग्राम पंचायतीने त्यांना उपलब्ध करून दिली होती. या संधीचे सोने महिलांनी केले आहे.सालमारा या पेसा गावातील अशिक्षित, गरीब, गरजू नऊ बचत गटातील विविध जाती, धर्मातील महिलांना तीन लाख रूपये तीन वर्षाकरिता देण्यात आले. यातून महिलांनी मधनिर्मिती केंद्राची स्थापना केली. याकरिता २० पेट्या खरेदी केल्या. मधमाशांचे पोळे आणून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक महिलांकडे सोपविण्यात आली. मधमाशांना पुष्परस मिळत नसल्याने सध्या बेसनपाणी व साखर खाद्य म्हणून दिल्या जात आहे.विशेष म्हणजे मोकळ्या जागेत उन्हातच मधमाशाच्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. उष्णतेमुळे मधमाशा जागा सोडू शकतात. बऱ्याच माशांचा मृत्यू झाला आहे. मध व्यवसाय, गावाबाहेर जंगलात उभारला असल्याने भविष्यात अस्वलासारखे रानटी प्राणी मधाचे पोळे फस्त करण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी महिलांना मध संकलन केंद्राच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध करून दिला. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी असल्याने योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मध निर्मिती प्रक्रियेतील संपूर्ण प्रशिक्षण देऊन उद्योगासंदर्भात महिलांचे मनोबल वाढविण्याची एकांत गरज आहे.महिला सक्षमीकरणासाठी तीन लाख रुपये खर्च करून सालमारा येथे मध निर्मिती केंद्र उभारले आहे. या माध्यमातून महिलांना व्यवसाय मिळाला आहे. परंतु सध्या कोरोेना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने मध निर्मिती केंद्राकडे दुर्लक्ष होत आहे. मधाविषयी संपूर्ण माहिती देणे अवगत झाले आहे. परंतु या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना उद्योगाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश आहे.- बी.टी.जवंजालकर, ग्रामसेवक, गट ग्रा.पं.जोगीसाखरा