शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 09:43 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले

मुंबई - महाराष्ट्र (Maharashtra) दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना मोठं यश मिळालं. गडचिरोली येथे चकमकीत ३८ लाखांचे बक्षीस असलेले ३ नक्षलवादी (Naxali) ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या C६० दलाने या नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट छत्तीसगड महाराष्ट्राच्या बॉर्डवर पोहोचले. सैन्य दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईचं कौतुक करत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. 

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली होती. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी अहेरी तालुक्यातील दामरंचा गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. इतिहास घडला.. अतिसंवेदनशील भागात, अतिदूर्गम भागात नागरिकांमध्ये जाऊन संवाद साधला. त्यांच्या मनातले जाणून घ्यायचे प्रयत्न केले.. इथे सर्व बंधू भगिनींना, बालमित्रांना भेटून आनंद झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.  तसेच, जिथे चकमक झाली, थेट छत्तीसगडच्या त्या सीमेवर देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. दामरंचा हे महाराष्ट्राचे शेवटचे गाव आहे. इथे आपल्या पोलिसांनी माओवाद्यांवर फार चांगल्या प्रकारे जरब बसवली आहे. त्यांचे मनोबल वाढवणे माझे कर्तव्य आहे. इथे पोलीस, केवळ पोलिसांचेच काम नव्हे तर नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम पण करतात. त्यामुळे, या पोलिसांचा आम्हाला अभिमान असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. दामरंचा येथे महाराष्ट्राचं शेवटचं पोलीस स्टेशन आहे. त्यानंतर, छत्तीसगडमध्ये इथून ३६ किमी अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. म्हणून, महाराष्ट्र पोलीसच तेथीलही सीमारेषेवर आपलं लक्ष केंद्रीत करतात, असे फडणवीस यांनी या भेटीदरम्यान सांगितले.    

दरम्यान, गडचिरोली भेटीदरम्यान, फडणवीसांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित लावली. यावेळी, पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलचे उद्घाटनही देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHome Ministryगृह मंत्रालयGadchiroliगडचिरोली