शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

ग्रामीण भागातील शाळांनाही सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मुख्यालयी (आपापल्या शाळांमध्ये) राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शिक्षकांना मात्र मुख्यालयी राहणे सक्तीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मुख्यालयी (आपापल्या शाळांमध्ये) राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना शासनाने सोमवारपासूनच सुट्या जाहीर केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासह जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळे बंद राहतील. स्वागत समारंभ, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. मंडई भरविता येणार नाही. लोकांचा जमाव होऊन संसर्ग वाढेल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. २५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. हॉटेल व लॉज मालकांनी बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी. राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमही रद्द करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोरोनाविषयी समाजमाध्यमांवर अफवा पसरवून भिती निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.वयस्क नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी५० पेक्षा अधिक वयाचे व्यक्ती तसेच आजारी नागरिक यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह, रक्तदाब असे आजार असल्यास प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. खोकला, सर्दी, तापाची लक्षणे एकत्रित जाणवल्यास घाबरून न जाता जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करावी. समाजात सध्यास्थितीत कोरोना रूग्ण म्हणजे गुन्हेगार किंवा तो वेगळा आहे, अशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता राहते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित रूग्णाचे खच्चीकरण न करता त्याला आरोग्य तपासणीसाठी त्याला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.आरोग्य यंत्रणा सज्जजिल्ह्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांना कोरोनाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Schoolशाळा