शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळांनाही सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मुख्यालयी (आपापल्या शाळांमध्ये) राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शिक्षकांना मात्र मुख्यालयी राहणे सक्तीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मुख्यालयी (आपापल्या शाळांमध्ये) राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना शासनाने सोमवारपासूनच सुट्या जाहीर केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासह जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळे बंद राहतील. स्वागत समारंभ, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. मंडई भरविता येणार नाही. लोकांचा जमाव होऊन संसर्ग वाढेल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. २५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. हॉटेल व लॉज मालकांनी बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी. राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमही रद्द करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोरोनाविषयी समाजमाध्यमांवर अफवा पसरवून भिती निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.वयस्क नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी५० पेक्षा अधिक वयाचे व्यक्ती तसेच आजारी नागरिक यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह, रक्तदाब असे आजार असल्यास प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. खोकला, सर्दी, तापाची लक्षणे एकत्रित जाणवल्यास घाबरून न जाता जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करावी. समाजात सध्यास्थितीत कोरोना रूग्ण म्हणजे गुन्हेगार किंवा तो वेगळा आहे, अशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता राहते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित रूग्णाचे खच्चीकरण न करता त्याला आरोग्य तपासणीसाठी त्याला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.आरोग्य यंत्रणा सज्जजिल्ह्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांना कोरोनाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Schoolशाळा