शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर कराराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:45 IST

विदर्भाला झुकते माप देण्याच्या उद्देशाने नागपूर करार करण्यात आला. मात्र राज्य शासनाने नागपूर कराराची पूर्णपणे पायमल्ली केली आहे.

ठळक मुद्देआरमोरी व गडचिरोली येथे आंदोलन : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा होता सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विदर्भाला झुकते माप देण्याच्या उद्देशाने नागपूर करार करण्यात आला. मात्र राज्य शासनाने नागपूर कराराची पूर्णपणे पायमल्ली केली आहे. नागपूर करारावर आपला विश्वास राहला नसून राज्य शासनाने स्वतंत्र विदर्भ द्यावा, या मागणीसाठी स्वतंत्र विदर्भ संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाºयांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले.कायमस्वरूपी समतोल विकास करण्यासाठी प्रादेशिकस्तरावर व स्थानिकस्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकार प्रदान करण्याचे नागपूर करारात अंतर्भूत आहे. मात्र राज्य शासनाने विदर्भाचा विकास न करता पश्चिम महाराष्टÑाचाच विकास केला आहे. विदर्भाच्या माथी अजूनही उपेक्षाच आली आहे. महाराष्टÑात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही, त्यामुळे स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन केले. आंदोलनात अरूण मुनघाटे, रमेश भुरसे, एजाज शेख, समया पसुला, गोवर्धन चव्हाण, नारायण मस्के, मनोहर हेपट, रमेश उप्पलवार, जनार्धन साखरे, बालू मडावी, विवेक चडगुलवार, रूचित वांढरे, सूरज मडावी, विवेक भुरसे, प्रतिक डांगे, प्रतिक बारसिंगे यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांची सुटका केली.आरमोरी येथे विदर्भवाद्यांनी केले आंदोलनआरमोरी येथील ब्रह्मपुरी-देसाईगंज टी-पार्इंटवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी माजी आ. हरीराम वरखडे यांच्या नेतृत्वात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. या कार्यक्रमाला शालिक नाकाडे, वामनराव जुआरे, श्रीराम कार, नरेंद्र तिजारे, दौलत मुर्वतकर, गोपिचंद मने, गणपतराव सेलोकर, यादव सहारे, ऋषी बांडे, कृष्णराव गारोदे, डाकराम चुटे, गंगाधर कोहाडे, तुकाराम कांबळे, शालिकराम मसराम, तारीक खान, छगन हेडावू उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.