शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

उच्चशिक्षितांनी संशोधनात स्थानिक समस्यांवर भर द्यावा

By admin | Updated: December 25, 2014 23:31 IST

खऱ्या समस्या ग्रामीण भागातच आहेत़ उच्चशिक्षितांनी त्यावर संशोधन केल्यास समस्यांचे निराकरण होण्याबरोबरच संशोधनक्षम वातावरण निर्माण होऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल,

गडचिरोली : खऱ्या समस्या ग्रामीण भागातच आहेत़ उच्चशिक्षितांनी त्यावर संशोधन केल्यास समस्यांचे निराकरण होण्याबरोबरच संशोधनक्षम वातावरण निर्माण होऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ़ अनिल काकोडकर यांनी गुरूवारी येथील गोंडवाना विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केले़ गोंडवाना विद्यापीठात आयोजित सुशासन कार्यक्रमात ते आज बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रणजितकुमार, प्रभारी कुलगुरु डॉ कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ़ डोळस, कुलसचिव डॉ़ विनायक इरपाते, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी, कोठारी उपस्थित होते़ याप्रसंगी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले, दीड वषार्पूर्वी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठात ‘सिलेज’ हा उपक्रम सुरू करण्यास आला़ शहर आणि ग्रामीण भागांचा मेळ साधून ग्रामीण भागात संशोधनास वाव द्यावा व त्यातून या भागाचा विकास करावा, अशी त्यामागील संकल्पना आहे़ ग्रामीण भागातही संशोधक आहेत़ मात्र, त्यांना शहरातील सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना वाव मिळत नाही़ त्यामुळे ग्रामीण संशोधकांना वाव देऊन येथील समस्या दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास या भागाचा विकास होऊन रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. आजच्या तरुण पिढीला भविष्यकाळानुरुप तयार करण्यासाठी चांगल्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही़ त्याअनुषंगाने विद्यापीठातील संशोधन व शिक्षणक्रम परिसरातील गरजानुरुप करणे अभिप्रेत असल्याचेही डॉ काकोडकर यांनी स्पष्ट केले़ कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल डॉ़ रोकडे, तर डॉ़ विनायक इरपाते यांनी आभार मानले़