शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेतकऱ्यांना उच्चदाबाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:10 IST

महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात काम सुरू : महावितरणची उच्चदाब वितरण प्रणाली योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.या योजनेंतर्गत एका वितरण रोहीत्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततचा विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची आता कायमची सुटका होणार आहे. या योजअंतर्गत ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे.या आधुनिक तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मयार्दीत ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. त्यामुळे आकडा टाकून होणाऱ्या वीजचोरीसही आळा बसणार आहे. कृषी पंपांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.चंद्रपूर विभागातील घुग्गूस तालुक्यातील वेंडली गावातील संजय नागापूरे , बल्लारषा विभागातील पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी गावातील जनार्धन खोब्रागडे , गडचिरोली मंडलातील पारडी गावातील भास्कर सितकुरा गंडाटे, चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई हरीदास देवतेळे यांच्याकडे वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई हरीदास देवतेळे यांनी महावितरणच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उच्च वीजदाबामुळे कापसाचे पीक घेण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.गडचिरोली तालुक्यातील पारडी गावातील भास्कर सितकुरा गंडाटे यांच्या सव्वादोन एकर शेतात आता पाण्याची सोय झाल्याने धानाचे पीक चांगल्याप्रकारे घेता आले आहे. रबीतही उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.

टॅग्स :electricityवीज