शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिक्रमण काढताच संरक्षण भिंतीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:09 IST

एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएटापल्ली पं.स.चा निर्णय : ४० वर्षांपूर्वीचे अतिक्रमण हटले

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे.पंचायत समितीच्या परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. सदर जागा पंचायत समितीची असली तरी मागील अनेक वर्षांपासून दुकाने होती. त्याचबरोबर काही नागरिकांनी पक्के बांधकामही केले होते. त्यामुळे सदर जागा आपल्याच मालकीची असल्याचे दुकानदार सांगत होते. अतिक्रमण हटवितेवेळी सुरूवातीला दुकानदारांनी पंचायत समिती प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या दबावाला न जुमानता पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी रविवारी अतिक्रमण हटवियाची कारवाई केली.अतिक्रमण हटवून ती जागा मोकळी केल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण वाढते हा आजपर्यंतचा अनुभव आहे.हे लक्षात घेऊन अतिक्रमण काढल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी पंचायत समिती प्रशासनाने संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात केली. यासाठी खोदकाम केले जात आहे. लवकरच बांधकामालाही सुरूवात होणार आहे.युवकांवर बेरोजगारीचे संकटपंचायत समितीमध्ये विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येत होते. त्यामुळे पंचायत समिती परिसरात हॉटेल, पानठेले, चहाचे दुकान व इतर किरकोळ दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानातून मिळणाºया मिळकतीतून प्रपंच भागत होता. मात्र प्रशासनाने अतिक्रमण हटविल्याने हे दुकानदार बेरोजगार झाले आहेत. त्यांना पुन्हा व्यवसायासाठी नवीन जागा किंवा काम शोधावे लागणार आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीEnchroachmentअतिक्रमण