शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

राजारामात मोकाट जनावरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:25 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर राहते ठिय्या : अपघाताची शक्यता; ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.राजाराम-कमलापूर मार्गावर मोकाट जनावरामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. सदर मार्गावर नियमित मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून असतात. सदर मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. भरधाव वाहनाची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी जनावराला वाहनाची धडक बसल्यास या अपघाताला जनावर मालक वाहन चालकाला व मालकाला जबाबदार धरतात. परिणामी त्यांना आर्थिक दंड भरून द्यावा लागतो. सातत्याने मागणी करूनही रस्त्यावर व गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. आता तरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने ठोस नियोजन करून मुख्य मार्गावरील तसेच गावातील जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहे.अहेरी तालुक्याच्या अनेक मोठ्या गावांमध्ये मोकाट जनावरांची समस्या सध्या ऐरणीवर आली आहे. वन विभागाच्या वतीने राखीव वन क्षेत्रात व इतर जंगल परिसरात कुंपन करून जनावरांना जंगलात शिरण्यास मज्जाव केला जात आहे. परिणामी जनावरांना चराईसाठी जागाच उरली नाही. त्यामुळे मोकाट जनावरे गावाच्या परिसरात तसेच मुख्य मार्गावर फिरत असतात. याला कारण बदलती परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळात पाळीव जनावरे चराईला नेण्यासाठी गुराखी मिळत होते. मात्र आता ग्रामीण भागातील गावांमध्ये गुराखी मिळत नाही. त्यामुळे जनावर मालकांकडेही जनावरे राखण्यासाठी वेळ नाही. परिणामी जनावर तशीच मोकाट सोडून दिली जातात. बंदोबस्त होणे आवश्यक आहे.अहेरीच्या आठवडी बाजारातही समस्याराजनगरी अहेरी शहरात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. अहेरी शहरासह लगतच्या गावातील अनेक महिला व पुरूष या बाजारात खरेदी व विक्रीसाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर आठवडी बाजारात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला आहे. अनेकदा बाजारात जनावरांची झुंज लागते. त्यामुळे यापूर्वी कित्येकदा नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १३ जुलै रोजी शनिवारला भरलेल्या येथील आठवडी बाजारात बैलाच्या झुंजीत एक वृध्द महिला खाली पडून जखमी झाली. सदर समस्येवर तोडगा न निघाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न.पं.ने बंदोबस्त करावा.