शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राजारामात मोकाट जनावरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:25 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर राहते ठिय्या : अपघाताची शक्यता; ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.राजाराम-कमलापूर मार्गावर मोकाट जनावरामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. सदर मार्गावर नियमित मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून असतात. सदर मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. भरधाव वाहनाची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी जनावराला वाहनाची धडक बसल्यास या अपघाताला जनावर मालक वाहन चालकाला व मालकाला जबाबदार धरतात. परिणामी त्यांना आर्थिक दंड भरून द्यावा लागतो. सातत्याने मागणी करूनही रस्त्यावर व गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. आता तरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने ठोस नियोजन करून मुख्य मार्गावरील तसेच गावातील जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहे.अहेरी तालुक्याच्या अनेक मोठ्या गावांमध्ये मोकाट जनावरांची समस्या सध्या ऐरणीवर आली आहे. वन विभागाच्या वतीने राखीव वन क्षेत्रात व इतर जंगल परिसरात कुंपन करून जनावरांना जंगलात शिरण्यास मज्जाव केला जात आहे. परिणामी जनावरांना चराईसाठी जागाच उरली नाही. त्यामुळे मोकाट जनावरे गावाच्या परिसरात तसेच मुख्य मार्गावर फिरत असतात. याला कारण बदलती परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळात पाळीव जनावरे चराईला नेण्यासाठी गुराखी मिळत होते. मात्र आता ग्रामीण भागातील गावांमध्ये गुराखी मिळत नाही. त्यामुळे जनावर मालकांकडेही जनावरे राखण्यासाठी वेळ नाही. परिणामी जनावर तशीच मोकाट सोडून दिली जातात. बंदोबस्त होणे आवश्यक आहे.अहेरीच्या आठवडी बाजारातही समस्याराजनगरी अहेरी शहरात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. अहेरी शहरासह लगतच्या गावातील अनेक महिला व पुरूष या बाजारात खरेदी व विक्रीसाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर आठवडी बाजारात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला आहे. अनेकदा बाजारात जनावरांची झुंज लागते. त्यामुळे यापूर्वी कित्येकदा नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १३ जुलै रोजी शनिवारला भरलेल्या येथील आठवडी बाजारात बैलाच्या झुंजीत एक वृध्द महिला खाली पडून जखमी झाली. सदर समस्येवर तोडगा न निघाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न.पं.ने बंदोबस्त करावा.