शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

वादळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : अंकिसा परिसरातील शेकडाे एकरवरील धानपीक पडले आडवे

लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिराेंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मंगळवारी रात्रभर वादळी पाऊस बरसला. या वादळी पावसाचा धान, मिरची, कापूस पिकांना माेठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली. तुडतुडा, मावा व इतर राेगाचे व्यवस्थापन करून व कीटकनाशक फवारणीवर हजाराे रुपयांचा खर्च केल्यानंतर शेतकऱ्यांचे धानपीक वाचले. हलके धानपीक पूर्णत: निसवल्याने येत्या काही दिवसात या धानाची कापणी करण्यात येणार हाेती. हातात भरघाेस उत्पादन हाेईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना हाेती. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास बराचवेळ वादळी पाऊस बरसला. पावसापेक्षा वादळाचा वेग अधिक हाेता. परतीच्या वादळी पावसामुळे परिसराच्या बालमृत्यमपल्ली येथे धानपिकाचे माेठे नुकसान झाले. कापणीयाेग्य झालेला शेतातील उभे धानपीक आडवे पडले. कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.  शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल विभागाने बालमृत्यमपल्ली व अंकिसा परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस