शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गडचिरोलीच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:44 IST

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस बरसला.

ठळक मुद्देजनजीवन प्रभावित नद्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस बरसला. पावसामुळे आलापल्ली-भामरागड व बामणी टेकडा ताला मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७७.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.धानोरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या पाच तालक्यात अतिवृष्टी झाली. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला.

पावसामुळे धान उत्पादकांना दिलासाचंद्रपूर- भंडारा जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून पावसाने हजेरी लावल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र धान रोवणीची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची प्रवासाची प्रतीक्षा आहे. मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान रोवणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली होती. रोवणीनंतर पुरेसा पाऊसच न आल्याने जमिनीला भेगा पडल्या होत्या. दरम्यान, शनिवारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाल्याने धान उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभर चंद्रपूर शहरासह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी खरीप हंगामातील खोळबंलेली शेतीची कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भावसुरूवातीला पावसाने साथ दिल्याने ही पिके जोमाने वाढत असल्याचे दिसून यत आहे. जिल्ह्यातील १० गावांमध्ये कपासीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे धान उत्पादक तालुक्यामध्ये रोवणीनंतर दमदार पाऊसच न आल्याने पीक करपण्याची स्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस