शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

जालन्यासह जिल्ह्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:05 IST

तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. पहाटे पाच ते सहा दरम्यान जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. पहाटे पाच ते सहा दरम्यान जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा पिकांना फायदा होणार असल्याने शेतकºयांची पिकांना पाणी देण्याची चिंता तात्पुरती का होईना मिटली आहे.भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, मंठा या तालुक्यांतील बहुतांश भागात पाऊस झाला. जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, वंजारउम्रद, जामवाडी, घाणेवाडी, तांदूळवाडी, गुंडेवाडी, निधोना, इंदेवाडी, धारकल्याण, नंदापूर, रामनगर, विरेगाव, सेवली, सिरसवाडी, रेवगाव आदी भागांत पहाटे चार ते सहा दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सकाळी दहा वाजता कडक ऊन पडले. वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर ढग दाटून आले. सुरुवातीला काही मिनिटे हलका पाऊस झाला. मात्र, सहावाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला.पावसामुळे जुना जालना भागातील टाऊन हॉल, भाग्यनगर, बाजार गल्ली, आदी भागांत पाणी साचले. नवीन जालन्यात काही ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. जालना शहरातून वाहणाºया कुंडलिका नदीवरील रामतीर्थ बंधाºयावरून प्रथमच पाणी वाहिले. पुराचे पाणी रामतीर्थ पुलाच्या खालील बाजूस असणाºया मंदिराच्या पायºयापर्यंत आले होते.या पावसामुळे शहरातील कुपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सायंकाळी बदनापूर शहरासह तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. दोन तास झालेल्या पावसाने जालना-औरंगाबाद हा रस्ता जलमय झाला होता. अंतर्गत भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.जालना परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. नागेवाडी जवळील टोल नाक्याजवळ नाल्याचे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने जालना-औरंगाबाद रस्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.नागेवाडी शिवारात सायंकाळी पाच वाजेनंतर जोदारा पाऊस झाला. त्यामुळे गावाच्या खालील बाजूने वाहणाºया नाल्याचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहू लागल्याने टोल नाक्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरुवातीला पाण्यातून वाहने नेल्यानंतर पाण्याचा जोर वाढल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. त्यामुळे जालना-औरंगाबाद मार्गावर दोन्ही बाजूने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. रात्री आठवाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.आठ वाजेनंतर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. दरम्यान, बसस्थानक परिसरात सीना नदीलाही पाणी आले होते. जालना तालुक्यातील निधोना, घाणेवाडी, पीरपिंपळगाव, गुंडेवाडी, चंदनझिरा, ढवळेश्वर भागातील नाल्यांनाही पूर आला होता.