शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

सहा गावांची जमीन मेडिगड्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:09 IST

महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन संपादित केली जात आहे.

ठळक मुद्दे६० टक्के जमीन मिळवली : गडचिरोली जिल्ह्याला पाणी मात्र मिळणार नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन संपादित केली जात आहे. त्यापैकी ६० टक्के जमीन प्रकल्पाने संपादितही केली आहे. परंतू या प्रकल्पातील एक थेंबही पाणी गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला येणार नसल्यामुळे प्रस्थापित शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे.सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाºया गोदावरी नदीवरील तेलंगणा सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम गेल्या तीन वर्षांपासून झपाट्याने सुरू आहे. या प्रकल्पाचे पाणी चक्क हैदराबादपर्यंत वाहून नेले जाणार आहे. त्यासाठी मोठमोठ्या पाईपलाईन आणि कालव्यांचेही काम सुरू आहे.संपूर्ण तेलंगणा सुजलाम सुफलाम करण्याचा तेलंगणा सरकारचा मानस आहे. परंतू पाणी असूनही घशाला कोरड अशी स्थिती असणाºया गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांना सरकारच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सिंचनाच्या अपुºया सुविधांचा सामना करावा लागत आहे.ज्या सहा गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी घेतली जात आहे त्यात वडधम येथील २३.५६२ हेक्टर, आयपेठा येथील ७२.९५६ हेक्टर, पोचमपल्ली येथील ५२.०८५ हेक्टर जमीन आधीच संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तुमनूर माल येथील १३.०१० ेहेक्टर आणि पेंटीपाका येथील १३.८०० हेक्टर जागेची मागणी करण्यात आली.जानेवारी २०१९ मध्ये मुगापूरमधील ११.८१० हेक्टर जागेच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्यापैकी १२४.२०३ हेक्टर खासगी जागा प्रकल्पाच्या ताब्यात गेली आहे. अजून ६३.०२ हेक्टर जागा संपादित करणे बाकी आहे.विशेष म्हणजे ६.१०६ हेक्टर शासकीय आणि ३.३५ हेक्टर वनजमीनीची खरेदी अद्याप झालेली नाही. शेतकºयांकडून खासगी जमिनी खरेदी करताना थेट खरेदी करण्यात आल्यामुळे वाटाघाटी करणाºया बºयाच शेतकºयांना जमिनीचा चांगला मोबदला मिळाला आहे. परंतू त्यांना आपल्या सुपिक जमिनीपासून कायमचे मुकावे लागणार आहे. दुसºया ठिकाणी शेतजमीन घेऊन शेती करणे कितपत शक्य होईल यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.गडचिरोली जिल्ह्यावर अन्यायचमहाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने केलेल्या करारानुसार या प्रकल्पाचा सर्व खर्च तेलंगणा सरकार करणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्व पाण्यावर त्यांनीच हक्क सांगितला आहे. वास्तविक या प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील ६ गावांमधील शेतकरी आपली जमीन देत असताना त्यांना थोडेतरी पाणी घेण्याचा आणि तशी तरतूद राज्य सरकारने करणे गरजेचे होते. परंतू त्याबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना त्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

टॅग्स :Damधरण