शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सहा गावांची जमीन मेडिगड्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:09 IST

महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन संपादित केली जात आहे.

ठळक मुद्दे६० टक्के जमीन मिळवली : गडचिरोली जिल्ह्याला पाणी मात्र मिळणार नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन संपादित केली जात आहे. त्यापैकी ६० टक्के जमीन प्रकल्पाने संपादितही केली आहे. परंतू या प्रकल्पातील एक थेंबही पाणी गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला येणार नसल्यामुळे प्रस्थापित शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे.सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाºया गोदावरी नदीवरील तेलंगणा सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम गेल्या तीन वर्षांपासून झपाट्याने सुरू आहे. या प्रकल्पाचे पाणी चक्क हैदराबादपर्यंत वाहून नेले जाणार आहे. त्यासाठी मोठमोठ्या पाईपलाईन आणि कालव्यांचेही काम सुरू आहे.संपूर्ण तेलंगणा सुजलाम सुफलाम करण्याचा तेलंगणा सरकारचा मानस आहे. परंतू पाणी असूनही घशाला कोरड अशी स्थिती असणाºया गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांना सरकारच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सिंचनाच्या अपुºया सुविधांचा सामना करावा लागत आहे.ज्या सहा गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी घेतली जात आहे त्यात वडधम येथील २३.५६२ हेक्टर, आयपेठा येथील ७२.९५६ हेक्टर, पोचमपल्ली येथील ५२.०८५ हेक्टर जमीन आधीच संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तुमनूर माल येथील १३.०१० ेहेक्टर आणि पेंटीपाका येथील १३.८०० हेक्टर जागेची मागणी करण्यात आली.जानेवारी २०१९ मध्ये मुगापूरमधील ११.८१० हेक्टर जागेच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्यापैकी १२४.२०३ हेक्टर खासगी जागा प्रकल्पाच्या ताब्यात गेली आहे. अजून ६३.०२ हेक्टर जागा संपादित करणे बाकी आहे.विशेष म्हणजे ६.१०६ हेक्टर शासकीय आणि ३.३५ हेक्टर वनजमीनीची खरेदी अद्याप झालेली नाही. शेतकºयांकडून खासगी जमिनी खरेदी करताना थेट खरेदी करण्यात आल्यामुळे वाटाघाटी करणाºया बºयाच शेतकºयांना जमिनीचा चांगला मोबदला मिळाला आहे. परंतू त्यांना आपल्या सुपिक जमिनीपासून कायमचे मुकावे लागणार आहे. दुसºया ठिकाणी शेतजमीन घेऊन शेती करणे कितपत शक्य होईल यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.गडचिरोली जिल्ह्यावर अन्यायचमहाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने केलेल्या करारानुसार या प्रकल्पाचा सर्व खर्च तेलंगणा सरकार करणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्व पाण्यावर त्यांनीच हक्क सांगितला आहे. वास्तविक या प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील ६ गावांमधील शेतकरी आपली जमीन देत असताना त्यांना थोडेतरी पाणी घेण्याचा आणि तशी तरतूद राज्य सरकारने करणे गरजेचे होते. परंतू त्याबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना त्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

टॅग्स :Damधरण