शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास झाला डोकेदुखी

By admin | Updated: October 14, 2016 01:47 IST

गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे.

डागडुजीचे काम शहरात सुरू : नागरिकांकडून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागावरच टीकेची झोडगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे. अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड मन:स्ताप खड्ड्यांमुळे सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने ओरड करीत असले तरी या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांचीच जबाबदारी ठरते, अशी माहिती पुढे आली आहे. गडचिरोली शहरातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव हा राष्ट्रीय महामार्ग जातो. याशिवाय गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-गोंदिया हाही राष्ट्रीय महामार्ग जातो. यंदा प्रचंड अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गांना जागोजागी खड्डे पडले आहेत. चंद्रपूर-गडचिरोली मार्गाची तर अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करावे लागणार आहे. यात राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही संबंध येत नाही. मात्र या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहे. अनेक नागरिकही गडचिरोलीस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना गावागावातून दूरध्वनी व भ्रमध्वनीवर या रस्त्याच्या तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही तेवढाच मन:स्ताप आपली जबाबदारी नसतानाही सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या प्रश्नावरून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ते दुरूस्तीचे काम आहे. पावसाळा आता संपला. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली. (जिल्हा प्रतिनिधी)गोदावरीच्या पुलाचे काम पूर्णसिरोंचा तालुक्यात तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीच्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाली. काही किरकोळ काम अपूर्ण आहे, ते पूर्ण केले जातील, अशी माहितीही अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी दिली. गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीच्या पुलाचेही काम लवकरच सुरू केले जाईल. सध्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यामुळे साहित्य ठेवण्यासही अडचण आहे. पाणी कमी होताच या पुलाच्या कामाला गती दिल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.