शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास झाला डोकेदुखी

By admin | Updated: October 14, 2016 01:47 IST

गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे.

डागडुजीचे काम शहरात सुरू : नागरिकांकडून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागावरच टीकेची झोडगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे. अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड मन:स्ताप खड्ड्यांमुळे सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने ओरड करीत असले तरी या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांचीच जबाबदारी ठरते, अशी माहिती पुढे आली आहे. गडचिरोली शहरातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव हा राष्ट्रीय महामार्ग जातो. याशिवाय गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-गोंदिया हाही राष्ट्रीय महामार्ग जातो. यंदा प्रचंड अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गांना जागोजागी खड्डे पडले आहेत. चंद्रपूर-गडचिरोली मार्गाची तर अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करावे लागणार आहे. यात राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही संबंध येत नाही. मात्र या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहे. अनेक नागरिकही गडचिरोलीस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना गावागावातून दूरध्वनी व भ्रमध्वनीवर या रस्त्याच्या तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही तेवढाच मन:स्ताप आपली जबाबदारी नसतानाही सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या प्रश्नावरून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ते दुरूस्तीचे काम आहे. पावसाळा आता संपला. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली. (जिल्हा प्रतिनिधी)गोदावरीच्या पुलाचे काम पूर्णसिरोंचा तालुक्यात तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीच्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाली. काही किरकोळ काम अपूर्ण आहे, ते पूर्ण केले जातील, अशी माहितीही अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी दिली. गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीच्या पुलाचेही काम लवकरच सुरू केले जाईल. सध्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यामुळे साहित्य ठेवण्यासही अडचण आहे. पाणी कमी होताच या पुलाच्या कामाला गती दिल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.